शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावात जाईल - सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:44 IST

Sushma Andhare : महाराष्ट्र व कर्नाटक अशी झुंज लावण्याचे काम भाजप करत आहे, हे सगळं ठरवून सुरू आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला.

उस्मानाबाद : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. आज बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. 

कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून जे काही झाले, ते चुकीचे आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार काही करत नाही. महाराष्ट्र व कर्नाटक अशी झुंज लावण्याचे काम भाजप करत आहे, हे सगळं ठरवून सुरू आहे. राजकीय अस्थिर करुन बेरोजगार, उद्योग महाराष्ट्र बाहेर पाठविण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकार व भाजपवर निशाणा साधला.

भाजप सरकार दोन्हीकडे आहे, त्यांना जाब विचारला पाहिजे. वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावात जाईल. तसेच, 17 तारखेला महाविकास आघाडी मुंबईत महामोर्चा काढणार आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, 17 तारखेला महाविकास आघाडी अरेरावी चालू देणार नाही. दिल्लीसमोर झुकणार नाही. 

याचबरोबर, एकीकडे सुषमा अंधारे यांची भीती नाही म्हणतात आणि भाजप मंत्री माझ्यावर रोज बोलतात. सभेत माझ्या विरोधात काही बोलले तरी मला ते अडकवू शकत नाहीत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv Senaशिवसेना