शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

विकासकामे केली असती, तर यात्रा काढण्याची गरजच नसती : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:14 IST

विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी लगावला.

ठळक मुद्देपैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले.

वाशिम : राज्य सरकार केवळ विकास कामांचा गवगवा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी लगावला. स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. यानिमित्त वाशिममध्ये सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमीत झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अजीत पवार म्हणाले, काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आली. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दाही निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे, बेरोजगारी आणि महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासह इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले असताना ते निकाली काढण्याऐवजी विद्यमान भाजपा शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला यावेळी अजीत पवार यांनी लगावला. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच फोडाफोडीचे राजकारणआजवरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने विरोधी पक्षांमधील लोकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी विशेष रणनिती आखली नाही; मात्र भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत 'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण अवलंबिले आहे, अशी टीकाही यावेळी अजीत पवार यांनी केली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसwashimवाशिम