शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे केली असती, तर यात्रा काढण्याची गरजच नसती : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:14 IST

विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी लगावला.

ठळक मुद्देपैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले.

वाशिम : राज्य सरकार केवळ विकास कामांचा गवगवा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी लगावला. स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. यानिमित्त वाशिममध्ये सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमीत झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अजीत पवार म्हणाले, काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आली. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दाही निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे, बेरोजगारी आणि महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासह इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले असताना ते निकाली काढण्याऐवजी विद्यमान भाजपा शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला यावेळी अजीत पवार यांनी लगावला. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच फोडाफोडीचे राजकारणआजवरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने विरोधी पक्षांमधील लोकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी विशेष रणनिती आखली नाही; मात्र भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत 'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण अवलंबिले आहे, अशी टीकाही यावेळी अजीत पवार यांनी केली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसwashimवाशिम