शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विकासकामे केली असती, तर यात्रा काढण्याची गरजच नसती : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:14 IST

विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी लगावला.

ठळक मुद्देपैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले.

वाशिम : राज्य सरकार केवळ विकास कामांचा गवगवा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी लगावला. स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. यानिमित्त वाशिममध्ये सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमीत झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अजीत पवार म्हणाले, काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आली. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दाही निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे, बेरोजगारी आणि महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासह इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले असताना ते निकाली काढण्याऐवजी विद्यमान भाजपा शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला यावेळी अजीत पवार यांनी लगावला. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच फोडाफोडीचे राजकारणआजवरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने विरोधी पक्षांमधील लोकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी विशेष रणनिती आखली नाही; मात्र भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत 'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण अवलंबिले आहे, अशी टीकाही यावेळी अजीत पवार यांनी केली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसwashimवाशिम