शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

धरमशालेच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन न झाल्यास देशावर संकट कोसळेल का? उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 9, 2016 12:47 IST

टी-२० वर्ल्डकपदरम्यान हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे होणा-या भारत-पाक सामन्यासाठी सुरक्षेची हमी देणा-या केंद्र सरकारवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - टी-२० वर्ल्डकपदरम्यान हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे होणा-या भारत-पाक सामन्यासाठी सुरक्षेची हमी देणा-या केंद्र सरकारवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे. ' धरमशालेतील क्रिकेटच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन झाले नाही तर देशावर संकटाचा पहाड कोसळणार आहे का? असा सवाल उद्धव यांनी विचारला. ' अयोध्येत रामाच्या पादुका आजही बेवारस आहेत, पण धर्मशालेत पाकड्यांच्या पादुकांचे पूजन दिल्लीश्‍वर करणारच असतील तर देशाची जनता वीरभद्र बनून जोडे मारल्याशिवाय राहणार नाही' असा कडक इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. 
'दिल्लीश्‍वरांचे पादुकापूजन!' या मथळ्याखाली लिहीलेल्या अग्रलेखात उद्धव यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असून आता पुन्हा भाजपा वि. शिवसेना असे युद्ध रंगण्याची शक्यता आहे. १९ मार्च रोजी धरमशाला येथे भारत वि. पाकिस्तान सामना आयोजित करण्यात आला असला तरी राज्य सरकारने त्यास विरोध दर्शवल्याने या सामन्याबाबत अद्याप साशंकता आहे. 'धरमशाला, कांगडा येथे पाकबरोबर क्रिकेट खेळणे म्हणजे सैनिकांच्या बलिदानांचा अपमान ठरेल. तेथे अनेक सैनिक तसेच शहीद सैनिकांची कुटुंबे राहतात. त्यांच्या भावनांचा आदर राखायला हवा, असे सांगत' हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी हा सामना खेळवण्यास नकार दिला. मात्र केंद्र सरकार सामना खेळवण्याच्या भूमिकेवर ठाम असून त्याच मुद्यावरून उद्धव यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच  राज्यकर्त्यांनी या देशात धर्म नावाची काही गोष्ट शिल्लक ठेवली आहे का? असा सवालही उपस्थित केला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- हिंदुस्थानचा ‘धर्म’ नक्की कोणता? मुळात राज्यकर्त्यांनी या देशात धर्म नावाची काही गोष्ट शिल्लक ठेवली आहे का? सगळ्या धर्मांच्या वर ‘राष्ट्रधर्म’ नावाचा एक प्रकार आहे व त्याच राष्ट्रधर्माची पुरती वाताहत झालेली आता दिसत आहे. ‘धर्मशाले’त पाकड्यांबरोबर क्रिकेट सामना खेळायचा म्हणजे खेळायचाच असे सध्याच्या दिल्लीश्‍वरांनी मनावर घेतलेले दिसते. १९ मार्चला हिमाचलमधील धर्मशालेत पाकबरोबरचा जो सामना होत आहे त्यास तेथील मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी विरोध केला. हा विरोध राजकीय नाही, धार्मिक तर अजिबात नाही, तर राष्ट्रधर्माचे पालन करण्यासाठी आहे. धर्मशाला, कांगडा येथे पाकबरोबर क्रिकेट खेळणे म्हणजे सैनिकांच्या बलिदानांचा अपमान ठरेल. कांगडा परिसरात अनेक सैनिक राहतात. शहीद सैनिकांची कुटुंबे राहतात. त्यांच्या भावनांचा आदर राखायला हवा, असे जर हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर तो ‘राजद्रोह’ किंवा देशद्रोहाचा गुन्हा ठरवून तुम्ही त्यांना फासावर लटकवणार का? अर्थात सैनिकांच्या भावना पायदळी तुडवून आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधाला न जुमानता दिल्लीश्‍वरांनी धर्मशालेत अधर्माची हिरवी पताका फडकवायचीच असा अफझलखानी विडा उचललेला दिसतोय. 
- धर्मशालेतील क्रिकेट सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार, असे आता टी-२० सामन्यांचे संचालक एमबी श्रीधर यांनीही सांगितले आहे. दुसरीकडे दिल्लीश्‍वरांनी कठोर शासनकर्त्यांच्या भाषेत बजावले आहे की, ‘पाकड्यांसाठी धर्मशालेत पायघड्या घालणार म्हणजे घालणारच. पाकड्या क्रिकेटपटूंना सुरक्षा पुरवणे वीरभद्र सरकारला झेपत नसेल तर दिल्लीश्‍वर पाकड्यांच्या सुरक्षेचा खास बंदोबस्त करतील व पाकड्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत.’ व्वा, शाब्बास! काय हा सुरक्षेबाबतचा आत्मविश्‍वास! हा आत्मविश्‍वास इतर वेळी कुठे पेंड खातो ते कळत नाही. आमच्या सुरक्षा यंत्रणा इतक्या मजबूत आहेत की पाकडे अतिरेकीच काय, पण तिकडील पाखरूही हिंदुस्थानच्या हद्दीत घुसू शकत नाही, असा काही आत्मविश्‍वास या मंडळींकडे आहे का? दिल्लीश्‍वर धर्मशालेत पाकड्या क्रिकेटपटूंचे संरक्षण स्वत: करणार आहेत. पण पाकिस्तानी सुरक्षा दलाचे एक पथकही धर्मशालेत पोहोचले व हिंदुस्थानचे सुरक्षा दल पाकड्यांच्या रक्षणासाठी काबील आहे की नाही याची सूक्ष्म पाहणी त्या पथकाने केली. 
- पठाणकोटच्या हल्ल्यानंतरही म्हणे पाकिस्तानचे ‘तपास पथक’ पंजाबात येऊन पाहणी करणार होते. हा तर शहीदांचा अपमान आणि तमाशाच म्हणावा लागेल. पाकड्यांसाठी पायघड्या घालणे हे तर आता नित्याचेच होऊन बसले. सरकारे बदलली तरी या कर्तव्यात कोणी कसूर करीत नाही. पण आता तर पायघड्या नाही, तर पाकड्यांच्या पादुका (जोडे) सिंहासनावर ठेवून कारभार केला जात आहे का? असा प्रश्‍न शहीदांच्या विधवांना व त्यांच्या अनाथ पोराबाळांना पडला तरी आश्‍चर्य वाटायला नको. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणखी एक ‘जीना’ निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी चिंता भाजपचे ज्वलंत खासदार योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली व ती योग्यच आहे. पण धर्मशालेत जर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन करण्याचा सोहळा पार पडलाच तर कबरीतला जीनादेखील अत्यानंदाने टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाही. 
- आमचा एक सिधासाधा सवाल आहे, जर धर्मशालेतील क्रिकेटच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन झाले नाही तर देशावर संकटाचा पहाड कोसळणार आहे काय? पाकड्यांच्या पादुकांचे पूजन होताच लाखो कोटींचा काळा पैसा धरती फाडून बाहेर येणार आहे, की महाराष्ट्रासह देशभरातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार आहेत? कश्मीर खोर्‍यात शांतता नांदून आमच्या सैनिकांच्या स्वागताच्या कमानी तेथे उभारल्या जातील की ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे बंद होऊन ‘भारतमाता की जय’ हा घोष सुरू होईल?