शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर दुष्काळ पडणार नाही !

By admin | Updated: September 19, 2015 21:18 IST

दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि

- उल्हास परांजपे (लेखक जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)

दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि येथेच आपण गल्लत करीत आहोत. पावसाच्या पाण्याची आपल्याकडून साठवणूक होत नसल्याने पावसाळा वगळता पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परिणामी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट नाहीसे करावयाचे असेल तर पाणी साठविणे सर्वात महत्त्वाचे आहे.मुंबई वगळता उर्वरित राज्याची परिस्थिती वेगळी आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भागातील पाण्याची मागणी आणि पाण्याचा पुरवठा यात खूप मोठा फरक आहे. शहरी भागांना उर्वरित आठ महिने तलावांतील पाणी पुरविले जात असल्याने त्यांना फार काही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही, परंतु पाणीकपातीला सामोरे जावे लागते. आणि ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठविण्यात येत नसल्याने पावसाळा वगळता पुढील आठ महिने येथील विहीर आणि तलाव कोरडे पडतात. नेमके हेच होऊ नये आणि भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून आपण बोअरवेल किंवा विहिरींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.दुष्काळी भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता जो काही पाऊस पडतो, त्याचे पाणी साठविण्याची गरज आहे. त्यासाठी माध्यम विहीर, बोअरवेल अथवा तळी का असेनात. महत्त्वाचे म्हणजे पाणी साठणे आहे. कारण शुक्रवारी जो पाऊस झाला त्या पावसाचे कित्येक पाणी आतापर्यंत समुद्राला मिळाले असेल. आपल्याकडे हे पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही, हे दुर्दैव आहे. आणि जी व्यवस्था आहे, ती पुरेशी नाही. म्हणूनच पाणी अडविण्यासह ते जिरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह उर्वरित सर्व यंत्रणांचा समन्वय गरजेचा आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यासाठी काम होणे गरजेचे आहे.विशेषत: ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी असो वा शेतीसाठीचे पाणी. ग्रामीण भागातील पाण्याच्या नियोजनासाठी भूगर्भशास्त्रज्ञ अथवा भूगर्भजलज्ज्ञ यांची मदत घेतली तर सोन्याहून पिवळे आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची याकामी मदत घेतली तर पाण्याचे निम्मे प्रश्न सुटतील. शिवाय पाण्याचा पुनर्वापर केला तरी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे हा, की पाण्याची मागणी काही केले तरी ती वाढणारच. त्या तुलनेत पुरवठा मात्र वाढणार नाही. म्हणून जलसाठ्यांची काळजी घेतली तर निश्चितच दिलासा मिळेल.दुसरे असे की मुंबईसारख्या मोठ्या शहरांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पाणीकपात झाली तरी त्यांना दररोज पाणी मिळते. ग्रामीण भागात असे होत नाही. मुंबईला हा प्रश्न भेडसावत नाही. कारण त्यांना लागणाऱ्या पाण्यासाठी जलसाठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईला एकूण सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलसाठे भरल्यास पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत नाही. मात्र मुंबईत वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न तोंड आ वासून उभा आहे. मुंबईतल्या वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केले तर मुंबईकर पाणीकपातीवरही सहज मात करतील.