शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रचनेत पुरेसे बदल झाल्यास प्रश्न सुटेल?

By admin | Updated: July 19, 2015 02:47 IST

आयुर्वेदीय पदवीधारांना आधुनिक वैद्यकातील औषधे वापरून व्यवसाय करण्यास परवानगी असावी किंवा नाही, असा एक मोठा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ज्यांनी जे शिक्षण घेतले आहे

- वैद्य श्रीप्रसाद धोंडोपंत बावडेकरआयुर्वेदीय पदवीधारांना आधुनिक वैद्यकातील औषधे वापरून व्यवसाय करण्यास परवानगी असावी किंवा नाही, असा एक मोठा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ज्यांनी जे शिक्षण घेतले आहे त्याचा वापर व्यावसायिक पद्धतीने करावा, हे त्याचे अगदी सर्वसामान्य उत्तर झाले. ते अत्यंत उचित आहे हेही सत्य़ परंतु हे उत्तर एवढे सोपे का नाही, हे पण समजावून घेतले पाहिजे.108 या महत्त्वाच्या सेवेत अनेक किंबहुना ९०% आयुर्वेदीय पदवीधर आहेत. त्यांना प्रशिक्षण पूर्णत: आधुनिक वैद्यकाचे. त्यांना अधिकारच नसतील तर ते आत्ययिक चिकित्सा कशी करतील, हा आणखी एक प्रश्न. तालुका पातळीवर, गाव पातळीवर आयुर्वेदीय पदवीधर काम करीत आहेत. त्यांना शल्यतंत्राचे अधिकार नसतील तर स्थानिक वैद्यकीय व्यवस्थेचे काय होईल? एमबीबीएस डॉक्टर्स जेथे पाऊलही टाकत नाहीत, अशा ठिकाणची शासकीय वैद्यक यंत्रणा केवळ बीएएमएस डॉक्टरांवर अवलंबून आहे. ही स्थिती केवळ दुर्गम भागातील नाही, तर शहरांतीलही आहे. वैद्यकीय सेवा शासकीय यंत्रणा आणि खाजगी व्यावसायिक यंत्रणा अशा दोन स्तरांवर उपलब्ध आहेत. यापैकी शासकीय यंत्रणेत जे आयुर्वेदीय पदवीधर काम करतात, ते आधुनिक वैद्यकाच्या पदवीधर अधिकाऱ्याच्या हाताखाली. त्यामुळे अधिकारी सांगेल त्या योजनेत हे वैद्य सहभागी होतात. त्या योजनेत आयुर्वेदीय औषधे उपलब्ध असतातच असे नाही. असतीलच तर त्यांचा पुरवठा चांगल्या आणि नियमित पद्धतीने होतोच असे नाही. यात नाकर्तेपणा कोणाचा, हा प्रश्न बाजूला ठेवला तरी वस्तुस्थिती बदलत नाही. आता नव्याने पंचकर्म केंद्रे सुरू झाली आहेत. ही चिकित्सा एका दिवसाची नसते. एका रुग्णाची चिकित्सा सुरू करून पूर्ण होईपर्यंत वैद्याला भलत्याच ठिकाणी जाऊन वेगळ्याच कामात सहभागी व्हावे लागते. हे वैद्य सर्व्हे प्रशिक्षण इ. कामे करतात. आयुर्वेद बाजूला राहतो.खाजगी वैद्यकीय व्यवसायाचे चित्र फारसे वेगळे नाही. ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर्स दिसत नाहीतच. शहरी भागात तरी जनरल प्रॅक्टिशनर्स किती, हा प्रश्नच आहे. हा प्रश्नही बाजूला ठेवला तरी सर्व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलांमध्ये हाऊसमन म्हणून काम करणारे एमबीबीएस किती, हा एक मोठा प्रश्न उभा राहातो. गेल्या काही वर्षांपासून आयुर्वेदीय चिकित्सक ग्रामीण भागातही यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा करताना दिसत आहेत. तालुका, मोठी गावे येथेही आयुर्वेदीय चिकित्सक शहरी भागाइतकेच स्थिरावले. त्यांनी अनेक आत्ययिक अवस्थांमध्येही उत्तम आयुर्वेदीय चिकित्सा केल्या आहेत. त्यामुळे केवळ कार्यचिकित्सा पातळीवरचा आयुर्वेदीय चिकित्सकांनी आयुर्वेदीय औषधेच वापरावीत, हा प्रश्न कदाचित सुटू शकेल. पण हजारो वर्षांची शल्यतंत्राची परंपरा असणाऱ्या आयुर्वेदाच्या पदवीधरांनी शल्यकर्मेही करू नयेत, असा आग्रह धरणे उचित नाही. आज आयुर्वेदीय शल्यतंत्राला केवळ क्षारकर्म अग्निकर्माच्या चौकटीत डांबून ठेवणे, हा उद्योग चालू आहे. तो आयुर्वेदाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरेल. हीच परिस्थिती आयुर्वेदाच्या बाकीच्या म्हणजे स्त्रीरोग, डोळा, नाक, कान, घसा इत्यादींची एकूण प्राप्त परिस्थिती बघता, आयुर्वेदीय पदवीधरांना आधुनिक औषधे आणि शल्यकर्म ३ ची परवानगी नाकारली तर शासकीय आणि खाजगी यंत्रणा कोलमडून पडेल, असा हा एक ‘कॅच २२’ होऊन बसला आहे. हा ‘कॅच’ एकेका धाग्याने मोकळा होऊ शकेल. पण तो एकांगी अट्टाहासाच्या किंवा अभिनिवेशात्मक विरोधाच्या भूमिकेतून होणारा नाही. आयुर्वेदीय पदवीधारांना शल्यकर्माची परवानगी देणे, याविषयी चर्चा होऊ शकत नाही. त्यातील कौशल्य परीक्षण इत्यादीची व्यवस्था बसवावी. पण परवानगी नाकारणे हे भारतीयत्वालाच विरोध करण्याजोगे आहे.काय चिकित्सक-फिजिशियन या स्तरावर आयुर्वेदीय खाजगी व्यावसायिक हळूहळू आयुर्वेदनिर्भर होत आहेत, कारण जनमानसाची मनोवृत्ती बदलते आहे. शासकीय स्तरावर मात्र धडाक्याने काम होण्याची गरज आहे. केंद्रीय स्तरावर आता आयुर्वेदाचे स्वतंत्र मंत्रालय आहे. काही राज्यांनीही अशी स्वतंत्र मंत्रालये सुरू केली आहेत. याच पद्धतीने आयुर्वेदीय पदवीधरांसाठी स्वतंत्र जिल्हा आरोग्य अधिकारी, जो स्वत: आयुर्वेदीय पदवीधर असेल असा नेमणे याचीही मोठी गरज आहे.