शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अनुदान वाढले, तर शिजेल पोषण आहार; आगाऊ रक्कम दिली तरच राबविणार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 07:57 IST

येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास शालेय पोषण आहार योजना राबविणार नाही, असा इशारा मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाला दिला आहे.  

मुंबई :  विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली शालेय पोषण आहार योजना यंदा अडचणीत येणार असल्याची चिन्हे आहेत. शालेय पोषण आहाराच्या निधीमध्ये सरकारने वाढ करावीच, शिवाय आवश्यक धान्य, आदी वस्तूंसह इंधन आणि खाद्यतेलाचा पुरवठाही शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी राज्य मुख्याध्यापक महासंघाकडून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास शालेय पोषण आहार योजना राबविणार नाही, असा इशारा मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाला दिला आहे.  

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, तसेच त्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाकडून मध्यान्ह पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच अनुदानित तत्त्वावरील खासगी शाळांमध्ये पोषण आहार योजना सुरू केली. यात विद्यार्थ्यांना तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ, वाटाणा, मटकी या साहित्याचा पोषण आहार करून दिला जातो.

यामध्ये पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी तांदूळ आणि डाळी, कडधान्य दिले जाते. गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. त्यासाठी बचत गटांना पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रती विद्यार्थ्यामागे खर्च असा इंधन आणि भाजीपाल्याचा खर्च दिला जातो.  मात्र, इंधन व तेलाचे दर वाढल्याने बचत गटांनी ही जबाबदारी नाकारली असून, शाळा स्तरावर व्यवस्था करावी, असे म्हटले आहे, अशी माहिती संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी दिली. 

आगाऊ रक्कम दिली तरच राबविणार योजना इंधन, तेलाचे दर तिप्पट वाढलेले असताना त्याच्या मोबदल्यात अतिशय तुटपुंजे अनुदान सरकार देत आहे. त्यातही अनुदान ४ ते ५ महिने उशिरा मिळते. जर पोषण आहाराचा दर्जा चांगला नसला, तर मुख्याध्यापकांना दोष दिला जातो. एकूणच योजनाही राबवायची आणि आर्थिक भुर्दंडही सहन करायचा, हे अशक्य असल्याची प्रतिक्रिया गणपुले यांनी दिली. दरम्यान, शासनाने पोषण आहाराचे सर्व साहित्य पुरविले आणि आवश्यक अनुदानात वाढ करून ती रक्कम आगाऊ दिली, तरच ती राबवू, असा इशाराही मुख्याध्यापक संघाने दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी