शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ST कर्मचाऱ्यांसाठी सदाभाऊ खोत यांची आक्रमक भूमिका; सरकारला दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 20:14 IST

राज्यात जवळपास ९० हजार एसटी कर्मचारी आहेत. दिवाळीवर तोंडावर आली असताना अद्यापही बोनस नाही असं खोत यांनी सांगितले.

मुंबई – ज्या कामगार संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे केले, एसटीला भ्रष्टाचाराच्या खाईत ओढली, अशा भ्रष्ट कामगार संघटनेसोबत सरकार चर्चा करते, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्यात एसटी वाचावी म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ लढा दिला त्या संघटनेसोबत सरकार बोलत नाही, हे खेदजनक बाब आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांनी एसटी संघटनांसोबत उद्या चर्चा करून समस्यांवर तोडगा काढण्याची भूमिका घेतली त्याबद्लल त्यांचे स्वागत करतो. परंतु एसटी कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळाला नाही तर दिवाळीनंतर महाराष्ट्रातील एसटीचे चाक जागेवर थांबल्याचे सरकारला दिसेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल सरकारने घ्यावी अशी त्यांची भूमिका आहे. राज्यात जवळपास ९० हजार एसटी कर्मचारी आहेत. दिवाळीवर तोंडावर आली असताना अद्यापही बोनस नाही, किमान १५ हजार बोनस मिळावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत एसटीचे विलिनीकरण करा किंवा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करा ही पूर्वीपासून मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. यावर निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १६ मागण्या राज्य सरकारपुढे ठेवल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार नियमित झाला पाहिजे, त्याची हमी सरकारने घेतली पाहिजे. मागील काळात पगार वाढ करण्यात आली, परंतु त्यात त्रुटी आहेत त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. सरकारने दोन बैठका घेतल्या, परंतु फक्त चर्चा होतात, चर्चेचे कागद गुंडाळून ठेवले जातात असं यावेळी होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेऊ आणि ही बाब उद्याच्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निदर्शनास आणून देऊ असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEknath Shindeएकनाथ शिंदेSadabhau Khotसदाभाउ खोत