पुणो : तंत्रज्ञानावर आधारित नवा मोटार परिवहन कायदा तयार केला आह़े तो अमलात आणल्यावर चौकात पोलीस लागणार नाही़ सिग्नल तोडला तर 24 तासांत घरी नोटीस येईल़ त्याविरोधात न्यायालयात गेलात तर तिप्पट दंड होईल, असा नियम आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुणो श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ज़ स़ करंदीकर स्मृती व्याख्यानात ‘सत्तांतराचा संदेश’ या विषयावर ते बोलत होत़े परिवहन विभागात कसे लक्ष्मीदर्शन होतेय याची आपल्याला चांगली माहिती आह़े हे टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवीन मोटार वाहन कायदा तयार केला असून, येत्या अधिवेशनात तो आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा असल्या तरी समस्या अनेक असून काम करणो कठीण आह़े मात्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासामुळे आम्ही यशस्वी होऊ, असे सांगून गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या 1क् वर्षाच्या काळात आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला होता़ केंद्राकडून निर्णय होत नव्हते, व्हिजन नव्हते. संसदेपेक्षा न्यायव्यवस्था वरचढ झाली होती़ या सरकारविषयी असंतोष होता़ त्यातूनच सत्तांतर झाले. शेजारच्या देशांशी संबंध बिघडलेले होते, ते सुधारण्यास मोदी सरकारने सुरुवात केली आहे. येत्या 2 वर्षात निव्वळ उत्पादनात 2 टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविले आह़े शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करू, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)