शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

घरातील काम करायची नसतील तर लग्नाआधी मुलीने सांगायला हवं; हायकोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:39 IST

कुटुंबात राहणाऱ्या महिलेला काम सांगितले याचा अर्थ तिला नोकरासारखी वागणूक मिळते असं नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

औरंगाबाद - मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या एका निकालाची चर्चा चांगलीच चर्चेत आली आहे. लग्न झालेल्या विवाहितेला घरातील कामं करायला सांगणं म्हणजे तिला नोकरासारखं वागवणं असा अर्थ होत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे पती किंवा सासरच्या लोकांकडून केलेल्या कृतीबाबत आरोप स्पष्ट झाल्याशिवाय ते कौर्य आहे की नाही हे सांगता येणार नसल्याचं हायकोर्टानं सांगितले आहे. 

अनेकदा काही महिलांकडून सासरच्या मंडळींविरोधात कामाचा जाच केल्याचा आरोप करण्यात येतो. त्यादृष्टीने हा महत्त्वाचा निकाल आहे. कुटुंबात राहणाऱ्या महिलेला काम सांगितले याचा अर्थ तिला नोकरासारखी वागणूक मिळते असं नाही. तिला लग्नानंतर घरातील कामे करायची नसतील तर तिने लग्नापूर्वी सांगायला हवं. जेणेकरून मुलाला तिच्याशी लग्न करायचं की नाही ठरवता येईल. त्यामुळे ही समस्या निर्माण होणार नाही असं हायकोर्टानं निकालात सांगितले आहे. 

एका महिलेने तिचा पती आणि सासरच्या कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठातील न्या. विभा कांकनवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी हा निकाल देत FIR रद्दबातल करण्याचे आदेश दिले. ४९८ अ घरगुती हिंसाचारानुसार, महिलेने पती आणि तिच्या सासरकडच्या लोकांवर आरोप केले होते. लग्नानंतर तिला नोकरासारखी वागणूक देण्यात आली. सासरच्या लोकांनी चारचाकी खरेदी करण्यासाठी ४ लाख रुपये मागितल्याचा आरोप महिलेने केला होता. 

माझ्या घरच्यांना परवडत नाही असं सांगितल्यानंतर सासरच्यांनी मानसिक आणि शारिरीक त्रास घेण्यास सुरुवात केली. त्याचसोबत मुलगा व्हावा यासाठी डॉक्टरकडेही घेऊन गेले. सासू आणि नणंदेकडून मारहाण व्हायची. ४ लाख दिल्याशिवाय घरी राहू देणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने सासरच्यांवर लावला. 

सासरच्या मंडळींनी केला युक्तिवादसासरकडून बाजू मांडण्यात असलेले वकील सागर भिंगारे यांनी कोर्टात म्हटलं की, सदर महिलेने आधीचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर असेच आरोप केले होते. त्यानंतर ते आरोपातून निर्दोष सुटले. पत्नीला असे आरोप करण्याची सवय लागल्याचं दिसून येते. १२ डिसेंबर २०१९ ला त्यांचे लग्न झाले. सप्टेंबर २०२० मध्ये महिलेने तक्रार दाखल केली. महिलेने आरोप केलेली घटना वडिलांच्या घरी २७ जून २०२० मध्ये घडली. म्हणजे लग्नाच्या ६-७ महिन्यात हा प्रकार झाला. याच काळात २८ फेब्रुवारी २०२० रोजी पतीने १७ लाखांची कार खरेदी केली. त्यामुळे माहेरी पैसे मागण्याचा प्रश्नच नव्हता. पोलीस तपास आणि वकिलांच्या युक्तिवादानंतर ही केस FIR नुसार उभी राहू शकत नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढला.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय