शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लक्ष्मी आली तर येऊ द्या, नाही म्हणू नका - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 05:38 IST

राजकारणामध्ये रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे.

अकोला : राजकारणामध्ये रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. कारंजा येथे शनिवारी त्यांनी उपरोेक्त वादग्रस्त वक्तव्य केल्यावर अकोल्यात बोलताना, आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत सांगितले.वाशिममधील कामरगाव येथे सभेत ठाकूर म्हणाल्या, आपले खिसे अजून गरम व्हायचे आहेत, विरोधकांचे खिसे मात्र ‘बंबाट’च भरलेली आहेत. ते खाली करण्यासाठी तुमच्याकडे ते आले तर घ्या. या विधानाच्या पुष्टीसाठी आपले सरकार आता आले आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे त्या म्हणाल्या.अकोल्यातील पातूर तालुक्याच्या आलेगाव येथे सभेत त्या म्हणाल्या, संध्याकाळी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका; मात्र मतदान आम्हालाच करा.>माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लक्ष्मीला नाकारू नका, असे वक्तव्य केले होते. मी केवळ त्याची आठवण करून दिली. त्यांचेच ते वाक्य होते. आता मात्र विरोधकांनी त्याच वाक्यावरून ट्रोल करायला सुरूवात केली आहे.- यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री>डल्ला मारण्यासाठी सत्तेत- फडणवीसमहाविकास आघाडीचे सरकार हे जनसेवेसाठी नाही तर डल्ला मारण्यासाठी सत्तेवर आले आहे. आम्ही नुकतीच शपथ घेतली, अजून आमचे खिसे गरम व्हायचे आहेत, असे स्वत: मंत्री जाहीर सभांमधून सांगत आहेत. जे मनात होतं, तेच आता शब्दांमधून बाहेर पडू लागले आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील खैरगाव, येनवा, बडेगाव, कांद्री मनसर, निमखेडा, सिर्सी, बेसा आणि येरखेडा येथे सभा घेतल्या.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर