शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 07:59 IST

Manoj Jarange Patil on Election: मनोज जरांगे : पाडायचे की लढायचे हे २९ ऑगस्टला ठरणार 

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री (जि. जालना) : सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. जे उमेदवार असतील, त्यांनी कागदपत्रे काढून ठेवावी. पाडायचे की लढायचे, हे २९ ऑगस्टला ठरणार आहे. आम्ही राज्यातल्या २८८ जागा लढण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती मनोज जरांगे- पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांसंदर्भात जरांगे म्हणाले की, मी सर्वांचा आदर करतो. ते नवीन काय काढायला लागले मला माहीत नाही. ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही.

नारायण राणे यांना इशाराखा. नारायण राणे यांनी जरांगेंना शनिवारी आव्हान दिले. यावर जरांगे म्हणाले की, त्यांनी मराठवाड्यात येऊ नये, असे आपण कधी बोललेलो नाही. निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे. मला धमक्या देऊ नका. मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही.

एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते - आंबेडकरमानोरा (जि. वाशिम) : लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना यांची युती संपुष्टात आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीदरम्यान ही युती पुन्हा जुळणार नाही. एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते, असे सांगून युतीचा विषय येथेच संपला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

रविवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे. आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचे ताट वेगळे कसे ठेवायचे, याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही, तोपर्यंत आरक्षणाचा हा फॉर्म्युला आम्ही कोणालाही देणार नाही. आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीनी मराठा, कुणबी सोडून फक्त्त ओबीसींच्या उमेदवारास मतदान करण्याची खूणगाठ बांधली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करू नयेत - अशोक चव्हाण नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पोहरादेवी येथील सभेत कुणबी आणि मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे वक्तव्य केले होते. त्यावर, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीजातीत, समाजात विशेषतः मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याचे काम करू नये. मराठा समाज एकत्र आहे; परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजातील अंतर्गत संबंध खराब होण्याचे काम होत असेल तर ते बरोबर नाही. जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarayan Raneनारायण राणे