शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 07:59 IST

Manoj Jarange Patil on Election: मनोज जरांगे : पाडायचे की लढायचे हे २९ ऑगस्टला ठरणार 

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री (जि. जालना) : सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. जे उमेदवार असतील, त्यांनी कागदपत्रे काढून ठेवावी. पाडायचे की लढायचे, हे २९ ऑगस्टला ठरणार आहे. आम्ही राज्यातल्या २८८ जागा लढण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती मनोज जरांगे- पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांसंदर्भात जरांगे म्हणाले की, मी सर्वांचा आदर करतो. ते नवीन काय काढायला लागले मला माहीत नाही. ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही.

नारायण राणे यांना इशाराखा. नारायण राणे यांनी जरांगेंना शनिवारी आव्हान दिले. यावर जरांगे म्हणाले की, त्यांनी मराठवाड्यात येऊ नये, असे आपण कधी बोललेलो नाही. निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे. मला धमक्या देऊ नका. मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही.

एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते - आंबेडकरमानोरा (जि. वाशिम) : लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना यांची युती संपुष्टात आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीदरम्यान ही युती पुन्हा जुळणार नाही. एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते, असे सांगून युतीचा विषय येथेच संपला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

रविवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे. आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचे ताट वेगळे कसे ठेवायचे, याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही, तोपर्यंत आरक्षणाचा हा फॉर्म्युला आम्ही कोणालाही देणार नाही. आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीनी मराठा, कुणबी सोडून फक्त्त ओबीसींच्या उमेदवारास मतदान करण्याची खूणगाठ बांधली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करू नयेत - अशोक चव्हाण नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पोहरादेवी येथील सभेत कुणबी आणि मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे वक्तव्य केले होते. त्यावर, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले, राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीजातीत, समाजात विशेषतः मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याचे काम करू नये. मराठा समाज एकत्र आहे; परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजातील अंतर्गत संबंध खराब होण्याचे काम होत असेल तर ते बरोबर नाही. जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarayan Raneनारायण राणे