शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राज्याचा प्रमुख हलला, तरच यंत्रणा हलेल; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 02:57 IST

पुराच्या काळात सरकारच अस्तित्वहीन असल्याचे टीकास्त्र

पुणे : ‘‘कोणत्याही आपत्तीकाळात झोकून देऊन काम करण्याचा सरकारी यंत्रणेचा इतिहास आहे. यंदा महापुरात मात्र सरकारचे अस्तित्व दिसत नव्हते. राज्याचा प्रमुख हलला, तरच सरकारी यंत्रणा हलते,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री व सरकारी यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली. पुराच्या विषयात राजकारण नको, असे म्हणत त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मदतकार्य सुरू करण्याचे आवाहनही केले.गुरुवारी (दि. ८) पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘अलमट्टी धरणाच्या संदर्भात दोन राज्यांच्या प्रमुखांमध्ये संवादाचा अभाव दिसतो आहे. पुराच्या विषयात राजकारण करायचे नाही, मात्र सरकारी यंत्रणा या काळात अस्तित्वहीन दिसत होती.राज्याचा प्रमुख संकटाकडे किती गंभीरपणे पाहतो यावर सरकारी यंत्रणेची हालचाल होते. तसे या काळात दिसले नाही.’’ या विषयावर अधिक बोलणे टाळत पवारांनी सरकारने तत्परतेने पुढे येऊन मदतीचे काम सुरू करणे गरजेचे आहे, असे सांगितले. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने तातडीने १०० टक्के कर्जमाफी द्यावी. नागरिकांना दिलासा द्यावा असे ते म्हणाले.शिवस्वराज्य यात्रा स्थगितपक्षाची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करत असल्याची घोषणा पवारांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देतील, असे सांगत पवारांनी पक्षाकडून लगेचच ५० लाख रूपये देत असल्याचे जाहीर केले.कोल्हापूर, सांगली परिसरावर अभुतपूर्व संकट आले आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे. मदतीचा हात देण्यात सरकारने कमी पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने पूरग्रस्त भागात जाऊन वैद्यकीय मदत सुरु केल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.अजित पवारांचे मत म्हणजे ‘राष्ट्रवादी’चे नव्हे!काश्मिरबाबतचे ३७० कलम रद्द करण्याच्या विषयावर काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीतही मतभेद आहेत का, यावर पवार म्हणाले, ‘‘हा राष्ट्रीय विषय आहे, त्यावर राज्यातील पदाधिकाऱ्यांनी काही मत व्यक्त केले असेल तर ते पक्षाचे मत आहे असे मी समजत नाही.’’ महापुराबाबत बोलणार असल्याचे सांगत पवारांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार