शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर वाद होणार नाहीत- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:41 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.

मुंबई : हे तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक मंत्र्यांनी त्यांना स्वत:ला दिलेली जबाबदारी सांभाळली आणि धोरणात्मक विषय महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा करुनच बाहेर बोलण्याची सवय लावली तर या सरकारमध्ये कोणतेही वाद होणार नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षीत होते ते पूर्ण होत आहे का?राज्यात कर्जमाफीचा सगळ्यात जटील प्रश्न होता. आम्ही विरोधी बाकावरुन तो प्रश्न सतत मांडत होतो. कर्जमाफी देऊ असे वचन आम्ही जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ते करताना लाखो शेतकऱ्यांना दिलासा देता आला. आता रितसर कर्ज भरणाºयांना दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. पहिल्या शंभर दिवसात आम्ही २५ लाख शेतकºयांना कर्जमाफी देऊ शकलो यासारखे मोठे समाधान नाही.मंत्री सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचा परिणाम सरकारवर होत नाही का? यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीहीनाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा किंवा नितीन राऊत यांनी १०० युनीटपर्यंत वीजमाफीचा विषय मांडला, मात्र त्यातून त्यांनी विभागाचे मत सांगितले. सभागृहात काही विषय आले तर त्यावर उत्तर द्यावे लागते. त्या उत्तरातून सरकारची व मंत्र्यांची सकारात्मता दिसून येते. त्यामुळे लगेच काही विरोधी मतप्रवाह आहेत असे अर्थ काढता येणार नाहीत. काही काळ जावा लागेल, म्हणजे आपोआप सगळे नीट होईल.शिवसेनेसोबत जाण्याआधी राष्ट्रवादीचे मत काय होते आणि आता १०० दिवसांनी तुमचे मत काय झाले आहे?शिवसेनेसोबतच्या कामाचा अनुभव नव्हता. शिवसेनेला कोणतीही गोष्ट पटवून देणे अशक्य आहे, असे आम्हाला भाजपचे नेते सांगायचे. शिवसेनेची प्रतिमा खलनायकी व्हावी असे भाजपला सतत वाटत असावे म्हणूनच ते तसे सांगत होते हे आता आम्हाला कळाले आहे. उलट शिवसेनेचे नेते अभ्यासू आहेत. त्यांना महाराष्टÑात चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे वाटत आहे. त्यामुळे भाजपचे प्रेम पुतनामावशीचे होते हे आम्हाला कळाले आहे. उलट आमची मैत्री निखळ आणि महाराष्टÑाच्या भल्यासाठी झाली आहे. आमचा अनूभव खूप चांगला आहे.हे सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्ही कशाच्या भरवशावर म्हणता?आम्ही सत्तेवर आल्यापासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात सगळीकडे महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. सरकार नसले तर काय होते हा अनुभव काँग्रेस, राष्टÑवादीने गेल्या पाच वर्षात घेतला आहे. भाजपच्या काळात जे काही आम्हाला करता आले नाही ती विकासाची कामे आता आम्ही तीघे मिळून करत आहोत.तीन पक्षात कसा समन्वय आहे आणि वाद कधी संपणार आहेत?समन्वय चालू झालाय. मधेच एखादे वेगळे उत्तर येणे हा अपघात आहे. आधीच चर्चा झाली तर व्यवस्थीत उत्तरे देता येतात. धोरणात्मक विषय समन्वय समितीत आधी चर्चा करुन बाहेर दिली जावीत अशा सूचना स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या आहेत. नवीन सरकार आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे, माध्यमांनी लगेच या सगळ्या गोष्टींना वादाचे, मतभेदाचे रुप देऊ नये.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील