शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर वाद होणार नाहीत- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:41 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.

मुंबई : हे तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक मंत्र्यांनी त्यांना स्वत:ला दिलेली जबाबदारी सांभाळली आणि धोरणात्मक विषय महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा करुनच बाहेर बोलण्याची सवय लावली तर या सरकारमध्ये कोणतेही वाद होणार नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षीत होते ते पूर्ण होत आहे का?राज्यात कर्जमाफीचा सगळ्यात जटील प्रश्न होता. आम्ही विरोधी बाकावरुन तो प्रश्न सतत मांडत होतो. कर्जमाफी देऊ असे वचन आम्ही जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ते करताना लाखो शेतकऱ्यांना दिलासा देता आला. आता रितसर कर्ज भरणाºयांना दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. पहिल्या शंभर दिवसात आम्ही २५ लाख शेतकºयांना कर्जमाफी देऊ शकलो यासारखे मोठे समाधान नाही.मंत्री सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचा परिणाम सरकारवर होत नाही का? यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीहीनाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा किंवा नितीन राऊत यांनी १०० युनीटपर्यंत वीजमाफीचा विषय मांडला, मात्र त्यातून त्यांनी विभागाचे मत सांगितले. सभागृहात काही विषय आले तर त्यावर उत्तर द्यावे लागते. त्या उत्तरातून सरकारची व मंत्र्यांची सकारात्मता दिसून येते. त्यामुळे लगेच काही विरोधी मतप्रवाह आहेत असे अर्थ काढता येणार नाहीत. काही काळ जावा लागेल, म्हणजे आपोआप सगळे नीट होईल.शिवसेनेसोबत जाण्याआधी राष्ट्रवादीचे मत काय होते आणि आता १०० दिवसांनी तुमचे मत काय झाले आहे?शिवसेनेसोबतच्या कामाचा अनुभव नव्हता. शिवसेनेला कोणतीही गोष्ट पटवून देणे अशक्य आहे, असे आम्हाला भाजपचे नेते सांगायचे. शिवसेनेची प्रतिमा खलनायकी व्हावी असे भाजपला सतत वाटत असावे म्हणूनच ते तसे सांगत होते हे आता आम्हाला कळाले आहे. उलट शिवसेनेचे नेते अभ्यासू आहेत. त्यांना महाराष्टÑात चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे वाटत आहे. त्यामुळे भाजपचे प्रेम पुतनामावशीचे होते हे आम्हाला कळाले आहे. उलट आमची मैत्री निखळ आणि महाराष्टÑाच्या भल्यासाठी झाली आहे. आमचा अनूभव खूप चांगला आहे.हे सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्ही कशाच्या भरवशावर म्हणता?आम्ही सत्तेवर आल्यापासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात सगळीकडे महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. सरकार नसले तर काय होते हा अनुभव काँग्रेस, राष्टÑवादीने गेल्या पाच वर्षात घेतला आहे. भाजपच्या काळात जे काही आम्हाला करता आले नाही ती विकासाची कामे आता आम्ही तीघे मिळून करत आहोत.तीन पक्षात कसा समन्वय आहे आणि वाद कधी संपणार आहेत?समन्वय चालू झालाय. मधेच एखादे वेगळे उत्तर येणे हा अपघात आहे. आधीच चर्चा झाली तर व्यवस्थीत उत्तरे देता येतात. धोरणात्मक विषय समन्वय समितीत आधी चर्चा करुन बाहेर दिली जावीत अशा सूचना स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या आहेत. नवीन सरकार आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे, माध्यमांनी लगेच या सगळ्या गोष्टींना वादाचे, मतभेदाचे रुप देऊ नये.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील