शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर वाद होणार नाहीत- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:41 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.

मुंबई : हे तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक मंत्र्यांनी त्यांना स्वत:ला दिलेली जबाबदारी सांभाळली आणि धोरणात्मक विषय महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा करुनच बाहेर बोलण्याची सवय लावली तर या सरकारमध्ये कोणतेही वाद होणार नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षीत होते ते पूर्ण होत आहे का?राज्यात कर्जमाफीचा सगळ्यात जटील प्रश्न होता. आम्ही विरोधी बाकावरुन तो प्रश्न सतत मांडत होतो. कर्जमाफी देऊ असे वचन आम्ही जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ते करताना लाखो शेतकऱ्यांना दिलासा देता आला. आता रितसर कर्ज भरणाºयांना दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. पहिल्या शंभर दिवसात आम्ही २५ लाख शेतकºयांना कर्जमाफी देऊ शकलो यासारखे मोठे समाधान नाही.मंत्री सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचा परिणाम सरकारवर होत नाही का? यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीहीनाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा किंवा नितीन राऊत यांनी १०० युनीटपर्यंत वीजमाफीचा विषय मांडला, मात्र त्यातून त्यांनी विभागाचे मत सांगितले. सभागृहात काही विषय आले तर त्यावर उत्तर द्यावे लागते. त्या उत्तरातून सरकारची व मंत्र्यांची सकारात्मता दिसून येते. त्यामुळे लगेच काही विरोधी मतप्रवाह आहेत असे अर्थ काढता येणार नाहीत. काही काळ जावा लागेल, म्हणजे आपोआप सगळे नीट होईल.शिवसेनेसोबत जाण्याआधी राष्ट्रवादीचे मत काय होते आणि आता १०० दिवसांनी तुमचे मत काय झाले आहे?शिवसेनेसोबतच्या कामाचा अनुभव नव्हता. शिवसेनेला कोणतीही गोष्ट पटवून देणे अशक्य आहे, असे आम्हाला भाजपचे नेते सांगायचे. शिवसेनेची प्रतिमा खलनायकी व्हावी असे भाजपला सतत वाटत असावे म्हणूनच ते तसे सांगत होते हे आता आम्हाला कळाले आहे. उलट शिवसेनेचे नेते अभ्यासू आहेत. त्यांना महाराष्टÑात चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे वाटत आहे. त्यामुळे भाजपचे प्रेम पुतनामावशीचे होते हे आम्हाला कळाले आहे. उलट आमची मैत्री निखळ आणि महाराष्टÑाच्या भल्यासाठी झाली आहे. आमचा अनूभव खूप चांगला आहे.हे सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्ही कशाच्या भरवशावर म्हणता?आम्ही सत्तेवर आल्यापासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात सगळीकडे महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. सरकार नसले तर काय होते हा अनुभव काँग्रेस, राष्टÑवादीने गेल्या पाच वर्षात घेतला आहे. भाजपच्या काळात जे काही आम्हाला करता आले नाही ती विकासाची कामे आता आम्ही तीघे मिळून करत आहोत.तीन पक्षात कसा समन्वय आहे आणि वाद कधी संपणार आहेत?समन्वय चालू झालाय. मधेच एखादे वेगळे उत्तर येणे हा अपघात आहे. आधीच चर्चा झाली तर व्यवस्थीत उत्तरे देता येतात. धोरणात्मक विषय समन्वय समितीत आधी चर्चा करुन बाहेर दिली जावीत अशा सूचना स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या आहेत. नवीन सरकार आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे, माध्यमांनी लगेच या सगळ्या गोष्टींना वादाचे, मतभेदाचे रुप देऊ नये.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील