शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिस्त मोडाल, तर सगळे पुन्हा बंद करावे लागेल; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 05:38 IST

शिक्षण, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण तुम्ही जर शिस्त मोडाल, रस्त्यावर गर्दी करुन गोंधळ घालाल तर पुन्हा सगळंच बंद करण्याची वेळ येईल. तुम्ही ते करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री जनतेला संबोधित करताना केले. येत्या रविवार म्हणजे ७ जूनपासून वर्तमानपत्र घरोघरी वाटप करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही या जाणिवेतून करू. शिक्षण आणि आरोग्य हे या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. तुम्ही खबरदारी घ्या; मी जबाबदारी घेतो असे सांगताना आता दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही, या जाणिवेतून करू असेही ठाकरे यांनी ठासून सांगितले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मुलांना तातडीने परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टर की सरासरी काढून गुण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांनी परीक्षा घेण्याचा धरलेला आग्रह खोडून काढला आहे.अनेक लोक शेवटच्या क्षणी रुग्णालयात धाव घेतात, आणि उपचार करण्याच्या आत त्यांचा दुदैर्वी मृत्यू होतो. हा आजार अंगावर काढण्यासारखा नाही. थोडा जरी ताप असला किंवा लक्षण असले तरी तातडीने डॉक्टरला दाखवा. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करेल, लॅबची संख्या वाढवली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.मी जे बोललो त्याचा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना राग आला पण त्यांनी त्या रागातून का होईना रेल्वे दिल्या. त्यामुळे बारा लाख लोक परराज्यात जाऊ शकले. एसटी महामंडळाने पाच लाख लोकांना राज्याबाहेर नेऊन सोडले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.रुग्णांचा ६५ हजार आकडा दिशाभूल करणाराराज्यात २९ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून फक्त ३४ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २४ हजार रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. आज महाराष्ट्रात फक्त दोनशे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १२०० रुग्ण गंभीर आहेत, मात्र बाकी सगळे रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी ६५ हजार हा आकडा दिशाभूल करणारा आहे, पण मोजण्याची ती पद्धत असल्यामुळे तो आकडा येतो असे सांगितले. अशा आकड्यांचा आधार घेऊन महाराष्ट्रातील आपलेच लोक आयुष्यभर महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असेही त्यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या