शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शिस्त मोडाल, तर सगळे पुन्हा बंद करावे लागेल; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 05:38 IST

शिक्षण, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण तुम्ही जर शिस्त मोडाल, रस्त्यावर गर्दी करुन गोंधळ घालाल तर पुन्हा सगळंच बंद करण्याची वेळ येईल. तुम्ही ते करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री जनतेला संबोधित करताना केले. येत्या रविवार म्हणजे ७ जूनपासून वर्तमानपत्र घरोघरी वाटप करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही या जाणिवेतून करू. शिक्षण आणि आरोग्य हे या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. तुम्ही खबरदारी घ्या; मी जबाबदारी घेतो असे सांगताना आता दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही, या जाणिवेतून करू असेही ठाकरे यांनी ठासून सांगितले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मुलांना तातडीने परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टर की सरासरी काढून गुण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांनी परीक्षा घेण्याचा धरलेला आग्रह खोडून काढला आहे.अनेक लोक शेवटच्या क्षणी रुग्णालयात धाव घेतात, आणि उपचार करण्याच्या आत त्यांचा दुदैर्वी मृत्यू होतो. हा आजार अंगावर काढण्यासारखा नाही. थोडा जरी ताप असला किंवा लक्षण असले तरी तातडीने डॉक्टरला दाखवा. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करेल, लॅबची संख्या वाढवली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.मी जे बोललो त्याचा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना राग आला पण त्यांनी त्या रागातून का होईना रेल्वे दिल्या. त्यामुळे बारा लाख लोक परराज्यात जाऊ शकले. एसटी महामंडळाने पाच लाख लोकांना राज्याबाहेर नेऊन सोडले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.रुग्णांचा ६५ हजार आकडा दिशाभूल करणाराराज्यात २९ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून फक्त ३४ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २४ हजार रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. आज महाराष्ट्रात फक्त दोनशे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १२०० रुग्ण गंभीर आहेत, मात्र बाकी सगळे रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी ६५ हजार हा आकडा दिशाभूल करणारा आहे, पण मोजण्याची ती पद्धत असल्यामुळे तो आकडा येतो असे सांगितले. अशा आकड्यांचा आधार घेऊन महाराष्ट्रातील आपलेच लोक आयुष्यभर महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असेही त्यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या