शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

महाराष्ट्रात एकजूट झाल्यास कॉँग्रेसला केंद्रात सत्ता - खर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 06:35 IST

पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल.

मुंबई  - पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल. त्यामुळे हात जोडतो, एक व्हा, मतभेद टाळा. जुन्या गोष्टी विसरून काँग्रेसला विजयी करण्यास एकदिलाने काम करा. दिल्लीतील विजय महाराष्ट्रातील एकजुटीतून मिळेल, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी नेत्यांना एकीचा मंत्र दिला. महाराष्ट्राचे प्रभारी पद स्वीकारल्यानंतर खर्गे प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले. सकाळी त्यांनी प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन पुढील रणनीतीची चर्चा केली.देशातील लोकशाहीच संकटात सापडली आहे. देशाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणायचे आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कामगिरीवरच दिल्लीतील सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे. केंद्रात सत्ता आणायची असेल, तर महाराष्ट्र राखावाच लागेल. त्यासाठी पक्षातील सर्व नेत्यांनी अंतर्गत वाद बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. - खा. मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी‘प्रोजेक्ट शक्ती’ने जनसहभागपक्षाचे धोरण, निर्णयप्रक्रियेत तळागाळातील कार्यकर्त्यांचाही समावेशव्हावा, यासाठी काँग्रेसने ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानाची राज्यात सुरुवात केली. ८८२८८४३०१० क्रमांकावर मतदार ओळखपत्रावरील क्रमांक एसएमएसद्वारे पाठविल्यास संबंधिताची नोंदणी होईल. त्यातून कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोज पाच नोंदणीकृत कार्यकर्त्यांशी स्थानिक विषयांवर फोनद्वारे संवाद साधणार आहेत.संविधानाचे रक्षण केले म्हणून चहावाला पंतप्रधानसायंकाळी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यभरातील पदाधिकाºयांना संबोधित केले. खर्गे म्हणाले, शेतकरी आत्महत्या, दलितांवरील वाढते अत्याचार, बिघडलेली अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवरून खर्गेयांनी मोदींवर टीकेची झोड उठविली. हरित क्रांतीपासून अंतराळातील यशाचापाया काँग्रेसने रचला आहे. काँग्रेसनेच देशातील लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण केले, म्हणूनच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकला. गिरणी कामगाराचा मुलगा लोकसभेतील विरोधी पक्षांचा नेता आहे, असा टोलाहीखर्गे यांनी हाणला. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण