शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

...अन्यथा शिवसेनेसमोरही भाजपला रोखण्याचे आव्हान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 16:03 IST

सर्व्हेनुसार शिवसेना बहुमतापासून दूर आहे. प्रत्यक्षात तसा निकाल लागल्यास, शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेत राहावे लागले. त्यामुळे युती तुटल्यास, राज्यात भाजपला रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी-काँग्रेससह शिवसेनेसमोर असणार आहे.

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर आली असून ही आकडेवारी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेचे टेन्शन वाढविणारी आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत भाजपला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. सहाजिक या जागा बहुमतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून भाजपकडून कार्यकर्त्यांना तशा सूचना देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपची वाढलेली ताकद राष्ट्रवादी-काँग्रेसप्रमाणेच मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगणाऱ्या शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे युती तुटल्यास भाजपला रोखण्याचे आव्हान आघाडीसह शिवसेनेसमोर उभे राहणार आहे.

अंतर्गत सर्व्हेत भाजपला १६०, शिवसेनेला ९० आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजप-शिवसेना एकत्र लढल्यास या जागा २३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर आघाडीला ५८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच भाजपला स्वबळावर लढणे फायद्याचे ठरणार आहे. अर्थात, युती केल्यास, भाजपच्या वाट्याला केवळ १४४ जागा येतील. त्यातही महायुतीतील घटक पक्षांना काही जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या तरी भाजपला बहुमत मिळणार नाही हे निश्चित आहे. अशा स्थितीत एकत्र लढून सरकार स्थापन करणे भाजपसाठी सोयीस्कर ठरू शकते.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेनेची युती ठरलेली आहे. लोकसभेला उभय पक्ष एकत्रच सामोरे गेले होते. त्यात दोन्ही पक्षांना चांगले यशही मिळाले. त्यावेळी विधानसभेलाही युती राहणार हे निश्चित कऱण्यात आले होते. परंतु, राज्यातील बदलेली स्थिती भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यातच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना देखील स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे.

सर्व्हेनुसार शिवसेना बहुमतापासून दूर आहे. प्रत्यक्षात तसा निकाल लागल्यास, शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेत राहावे लागले. त्यामुळे युती तुटल्यास, राज्यात भाजपला रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी-काँग्रेससह शिवसेनेसमोर असणार आहे.