शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 01:25 IST

कायदा प्रभावी करण्याचा उद्देश; नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंड

नवी दिल्ली : तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा सरकार विचार करीत आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिक भक्कम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तंबाखू नियंत्रणासाठी कायद्यात काय दुरुस्ती कराव्यात, याबाबत शिफारस करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक कायदा उपसमिती नेमली होती. या समितीने शिफारशींसह आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सादर केला आहे.तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्यासोबत नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढविण्याची शिफारस या समितीने केली आहे. यासोबतच सिगारेट आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापारावर निगराणीची आणि त्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचे समितीने सुचविले आहे. यातहत उत्पादनाच्या ठिकाणी निगराणी ठेवून तंबाखूजन्य उत्पादनांवर बार कोड लावला जाईल. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना उत्पादन वैध आहे का? त्यावरील देय कर चुकता आलेला आहे काय? हे निश्चित करण्यात मदत होईल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात धूम्रपान केल्यास दंड वाढविण्याचाही विचार आहे. सध्या दोनशे रुपये दंड आहे.जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार (जीएटीएस-२) तंबाखू सेवनाचे सुरुवातीचे सरकारी वय १७.९ वर्षांवून १८.९ वर्षे करण्यात आले आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात असताना बव्हंशी लोक तरुणपणात धूम्रपानाकडे वळतात. १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुण मुले मित्रांचा दबाव किंवा प्रचलन म्हणून धूम्रपान करतात. कायदेशीर वय २१ वर्षे केल्यास तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वा धूम्रपान करणाºया युवकांच्या संख्येत दरवर्षी कमालीची घट होईल. एवढेच नव्हे, तर आई-वडिलांनाही २१ वर्षे वयाखालील मुलांना दुकानात तंबाखूजन्य पदार्थ खरेदीसाठी पाठवू शकणार नाहीत, असे एका अधिकाºयाने सांगितले. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायद्यातहत सार्वजिक ठिकाणी धूम्रपानास मनाई आहे. शैक्षणिक संस्थेच्या शंभर मीटर परिसरात सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थ १८ वर्षांखालील मुलांना विकण्यास मनाई आहे.विधेयकात पुन्हा दुरुस्तीआरोग्य मंत्रालयाने २००३ च्या विधेयकात अनेक दुरुस्ती प्रस्तावित करून सिगारेट आण अन्य तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य नियमन, उत्पादन, पुरवठा-वितरण ) दुरुस्ती विधेयकाचा मसुदा २०१५ मध्ये जारी केला होता. तथापि, २०१७ मध्ये मसुद्यातील तरतुदींबाबत फेरविचार करण्यासाठी हा मसुदा मागे घेण्यात आला होता. आता आरोग्य मंत्रालयाने पुन्हा विधेयकात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.