शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 07:39 IST

मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - देशद्रोहाची व्याख्या अशी सोयीनुसार बदलता येणार नाही. अफझल गुरूच्या समर्थनाचे नारे देणे हा देशद्रोह ठरत असेल तर सैनिकांच्या पत्नींचा अत्यंत खालच्या स्तरावर अवमान करणाऱ्या भाजप आमदाराचा गुन्हा निदान भयंकर अपराध तरी ठरू द्या. मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे  समजायला हरकत नाही! देशभक्तीचे मुखवटे घातकच आहेत अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
लोकशाही म्हणजे काय याबाबत आपल्या देशात आजही तसे गोंधळाचेच वातावरण आहे, त्याच पद्धतीने ‘देशभक्ती’ म्हणजे नक्की काय, याचीही व्याख्या आपल्याकडे ठरत नाही. ‘हत्ती व सात आंधळे’ या कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना जो तो आपल्या पद्धतीने करताना दिसत आहे.  देशभक्तीचा मक्ता कुणा एकाच व्यक्तीकडे किंवा संघटनेकडे असता कामा नये. म्हणजे अमूक व्यक्तीने अमूक केले म्हणजेच तो देशभक्त आणि तमूक केले तर देशद्रोही असा जबरदस्तीचा कारभार उपयोगाचा नाही. उदाहरणच द्यायचे तर गांधीहत्या हे पातकच आहे. पण नथुराम गोडसे देशभक्त नव्हताच किंवा तो देशद्रोही होता हे ठरवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुळात स्वतंत्र हिंदुस्थानात राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी ‘देशभक्ती’चा जो घोळ घालून ठेवला आहे तो चिंताजनकच आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘जेएनयू’चा नेता कन्हैया हा पक्का देशद्रोही आहे, पण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांतजी परिचारकसाहेब हे मात्र देशद्रोही नाहीत. सैनिक व त्यांच्या कुटुंबाचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार भयंकर असला तरी सरकार किंवा पक्षातर्फे यावर कोणीच साध्या निषेधाचे भाष्य केलेले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पडलेल्या ठिणगीचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षाने रान पेटवले होते.
 
कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनांविरोधात भाजपची विद्यार्थी परिषद असा हा जोरदार सामना तेव्हा गाजला. पण याच ‘अभाविप’ने प्रशांत परिचारक यांच्या अश्लील शेरेबाजीविरुद्ध उलटा पवित्रा घेतला. परिचारक यांचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी गटांना धमक्या देऊन फलक लावले व त्यासाठी पोलिसांची मदत घेतली. हे सत्य असेल तर कन्हैयाविरोधाचा लढा भंपक होता असेच म्हणावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
‘नोटाबंदी’स विरोध करणारे भ्रष्ट किंवा देशविरोधी आहेत हे सरकारी म्हणणे आहे, पण नोटाबंदीनंतरही सीमेवरील जवानांचे बलिदान थांबलेले नाही व सरकार अपयशी ठरले आहे हे कोणत्या देशभक्तीचे लक्षण मानायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.