शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 07:39 IST

मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - देशद्रोहाची व्याख्या अशी सोयीनुसार बदलता येणार नाही. अफझल गुरूच्या समर्थनाचे नारे देणे हा देशद्रोह ठरत असेल तर सैनिकांच्या पत्नींचा अत्यंत खालच्या स्तरावर अवमान करणाऱ्या भाजप आमदाराचा गुन्हा निदान भयंकर अपराध तरी ठरू द्या. मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे  समजायला हरकत नाही! देशभक्तीचे मुखवटे घातकच आहेत अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
लोकशाही म्हणजे काय याबाबत आपल्या देशात आजही तसे गोंधळाचेच वातावरण आहे, त्याच पद्धतीने ‘देशभक्ती’ म्हणजे नक्की काय, याचीही व्याख्या आपल्याकडे ठरत नाही. ‘हत्ती व सात आंधळे’ या कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना जो तो आपल्या पद्धतीने करताना दिसत आहे.  देशभक्तीचा मक्ता कुणा एकाच व्यक्तीकडे किंवा संघटनेकडे असता कामा नये. म्हणजे अमूक व्यक्तीने अमूक केले म्हणजेच तो देशभक्त आणि तमूक केले तर देशद्रोही असा जबरदस्तीचा कारभार उपयोगाचा नाही. उदाहरणच द्यायचे तर गांधीहत्या हे पातकच आहे. पण नथुराम गोडसे देशभक्त नव्हताच किंवा तो देशद्रोही होता हे ठरवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुळात स्वतंत्र हिंदुस्थानात राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी ‘देशभक्ती’चा जो घोळ घालून ठेवला आहे तो चिंताजनकच आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘जेएनयू’चा नेता कन्हैया हा पक्का देशद्रोही आहे, पण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांतजी परिचारकसाहेब हे मात्र देशद्रोही नाहीत. सैनिक व त्यांच्या कुटुंबाचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार भयंकर असला तरी सरकार किंवा पक्षातर्फे यावर कोणीच साध्या निषेधाचे भाष्य केलेले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पडलेल्या ठिणगीचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षाने रान पेटवले होते.
 
कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनांविरोधात भाजपची विद्यार्थी परिषद असा हा जोरदार सामना तेव्हा गाजला. पण याच ‘अभाविप’ने प्रशांत परिचारक यांच्या अश्लील शेरेबाजीविरुद्ध उलटा पवित्रा घेतला. परिचारक यांचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी गटांना धमक्या देऊन फलक लावले व त्यासाठी पोलिसांची मदत घेतली. हे सत्य असेल तर कन्हैयाविरोधाचा लढा भंपक होता असेच म्हणावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
‘नोटाबंदी’स विरोध करणारे भ्रष्ट किंवा देशविरोधी आहेत हे सरकारी म्हणणे आहे, पण नोटाबंदीनंतरही सीमेवरील जवानांचे बलिदान थांबलेले नाही व सरकार अपयशी ठरले आहे हे कोणत्या देशभक्तीचे लक्षण मानायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.