शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 07:39 IST

मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - देशद्रोहाची व्याख्या अशी सोयीनुसार बदलता येणार नाही. अफझल गुरूच्या समर्थनाचे नारे देणे हा देशद्रोह ठरत असेल तर सैनिकांच्या पत्नींचा अत्यंत खालच्या स्तरावर अवमान करणाऱ्या भाजप आमदाराचा गुन्हा निदान भयंकर अपराध तरी ठरू द्या. मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे  समजायला हरकत नाही! देशभक्तीचे मुखवटे घातकच आहेत अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
लोकशाही म्हणजे काय याबाबत आपल्या देशात आजही तसे गोंधळाचेच वातावरण आहे, त्याच पद्धतीने ‘देशभक्ती’ म्हणजे नक्की काय, याचीही व्याख्या आपल्याकडे ठरत नाही. ‘हत्ती व सात आंधळे’ या कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना जो तो आपल्या पद्धतीने करताना दिसत आहे.  देशभक्तीचा मक्ता कुणा एकाच व्यक्तीकडे किंवा संघटनेकडे असता कामा नये. म्हणजे अमूक व्यक्तीने अमूक केले म्हणजेच तो देशभक्त आणि तमूक केले तर देशद्रोही असा जबरदस्तीचा कारभार उपयोगाचा नाही. उदाहरणच द्यायचे तर गांधीहत्या हे पातकच आहे. पण नथुराम गोडसे देशभक्त नव्हताच किंवा तो देशद्रोही होता हे ठरवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुळात स्वतंत्र हिंदुस्थानात राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी ‘देशभक्ती’चा जो घोळ घालून ठेवला आहे तो चिंताजनकच आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘जेएनयू’चा नेता कन्हैया हा पक्का देशद्रोही आहे, पण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांतजी परिचारकसाहेब हे मात्र देशद्रोही नाहीत. सैनिक व त्यांच्या कुटुंबाचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार भयंकर असला तरी सरकार किंवा पक्षातर्फे यावर कोणीच साध्या निषेधाचे भाष्य केलेले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पडलेल्या ठिणगीचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षाने रान पेटवले होते.
 
कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनांविरोधात भाजपची विद्यार्थी परिषद असा हा जोरदार सामना तेव्हा गाजला. पण याच ‘अभाविप’ने प्रशांत परिचारक यांच्या अश्लील शेरेबाजीविरुद्ध उलटा पवित्रा घेतला. परिचारक यांचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी गटांना धमक्या देऊन फलक लावले व त्यासाठी पोलिसांची मदत घेतली. हे सत्य असेल तर कन्हैयाविरोधाचा लढा भंपक होता असेच म्हणावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
‘नोटाबंदी’स विरोध करणारे भ्रष्ट किंवा देशविरोधी आहेत हे सरकारी म्हणणे आहे, पण नोटाबंदीनंतरही सीमेवरील जवानांचे बलिदान थांबलेले नाही व सरकार अपयशी ठरले आहे हे कोणत्या देशभक्तीचे लक्षण मानायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.