शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...तर 'मी पुन्हा येईन'; फडणवीसांकडून घोषणेचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 22:38 IST

पुन्हा निवडणुका आल्या तरीही सामोरं जाण्याची तयारी; फडणवीसांचं सूचक विधान

मुंबई: जनतेनं आम्हाला सरकार चालवण्यासाठी पहिली पसंती दिली होती. मात्र इतर पक्षांनी बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन केलं. आता आमच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. माझा डीएनएच विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडू, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या भूमिकेसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले. पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर मी पुन्हा येईन, असंदेखील ते पुढे म्हणाले. आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम करू. पुन्हा निवडणुका आल्या तरीही त्यांना सामोरं जाण्याची आमची तयारी आहे, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं. 'मी पुन्हा येईन असं जेव्ही मी म्हटलं होतं, तेव्हा तशी घोषणा माझ्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे आता  पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर 'मी पुन्हा येईन,' असं फडणवीस म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र विकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली. आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी उलगडून सांगितल्या. लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा