शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझा बळी; प्रताप सरनाईक यांचा पुनरुच्चार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:10 IST

ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीला मी, माझे कुटुंब सहकार्य करीत आहे. यात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली. माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझ्यासारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे केला. परंतु मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत छेडले असता, त्याला वेळ झाला असल्याचे सांगत आता आपले विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीला मी, माझे कुटुंब सहकार्य करीत आहे. यात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली. माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार या प्रक्रियेत मला संरक्षण मिळाले असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना छेडले असता, ते म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृतीप्रिय राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षांत खूप बदल झाला आहे. त्यामुळे तरुण पिढी राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले, त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, त्यांनी बोलणे टाळले. शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराज आहात का, असे  विचारले असता, तसे काहीही नसल्याचे सांगितले. तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक