शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझा बळी; प्रताप सरनाईक यांचा पुनरुच्चार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:10 IST

ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीला मी, माझे कुटुंब सहकार्य करीत आहे. यात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली. माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझ्यासारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे केला. परंतु मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत छेडले असता, त्याला वेळ झाला असल्याचे सांगत आता आपले विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीला मी, माझे कुटुंब सहकार्य करीत आहे. यात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली. माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार या प्रक्रियेत मला संरक्षण मिळाले असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना छेडले असता, ते म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृतीप्रिय राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षांत खूप बदल झाला आहे. त्यामुळे तरुण पिढी राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले, त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, त्यांनी बोलणे टाळले. शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराज आहात का, असे  विचारले असता, तसे काहीही नसल्याचे सांगितले. तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक