शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

गुवाहाटीहून मला परत यायचं होतं, पण...; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 18:23 IST

१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

मुंबई - आम्ही गुवाहाटीत गेल्यानंतर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आम्ही काहीतरी वाईट करून आलो असं वाटायला लागलं. मी गुवाहाटीला जाऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटत होते. मला परत यायचं होतं पण आलेला माणूस जाऊन द्यायचा नाही अशी ती वेळ होती. त्याला पर्याय नव्हता असं सांगत बच्चू कडू यांनी सत्तांतराच्या घडामोडीवर भाष्य केले आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे हा मैदानावरचा कार्यकर्ता, रात्री २ वाजता वर्षा बंगल्यावर दीड हजार लोकं असतात. ही चांगली बाब आहे. मी दिव्यांगांसाठी काम केले. उद्धव ठाकरेंच्या शेजारचे लोक, अधिकारी होते ते काम करत नव्हते. दिव्यांगाबाबत दीड वर्ष बैठकही लावली नव्हती. उद्धव ठाकरेंबद्दल आस्था आहे. परंतु ते मातोश्रीवर जेवढे मजबूत होते तेवढे वर्षावर नव्हते. सत्तेत गेल्यावर काही महत्त्वाचे विषय मार्गी लागणं गरजेचे असते पण ते झाले नाही. ही बाब मनाला खटकत होती. त्याचसोबत मी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मतदारसंघातील प्रकल्प अर्धवट पडले आहेत. सत्ता किती महत्त्वाची सगळ्यांना माहिती आहे. किती वर्ष सत्तेच्या बाहेर राहणार ही कार्यकर्त्यांची भूमिका होती, सत्ता मंत्री म्हणून पाहिली पाहिजे अशी भावना होती. मतदारसंघातील विकासकामांना चालना देता आली असं त्यांनी सांगितले. 

तसेच रवी राणाने जे शब्द वापरले, तोडपाणी करतो, गुवाहाटीला पैशासाठी गेला. आयुष्यात पैशासाठी काम केले नाही. माझी संपत्ती व्हावी अशी माझी भूमिका नव्हती. विरोधकांचे आरोप होते. पण सत्तेतला माणूस जेव्हा असे आरोप करतो त्यावर शिक्कामोर्तब होतो. माझे नाव घेऊन आरोप केले ते मला खटकले. वेदना देणाऱ्या गोष्टी होत्या. राणांमागे कोण आहे ते शोधणं गरजेचे आहे. पुराव्याशिवाय बोलू नये. आम्ही २०-२५ वर्ष काम करतोय. जात-पात-धर्म राजकारणात आणलं नाही. तत्व, रणनीती राजकारणात जपली असं सांगत बच्चू कडू यांनी राणांवर प्रहार केला. 

...असं वाटलं नव्हतं. काही झाले असते तर प्रहार पक्षात शिंदे गट आला असता. सहजपणे मी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा होईल असं बोलून गेलो. पण असं काही मनात नव्हतं. मी मंत्रिपदातून इतका काळ बाहेर राहीन वाटलं नव्हतं. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल वाटलं होते. पण सगळ्या गोष्टींचे राजकारणात पालन होत नाही. काही डावपेच असतात. मी वयाच्या आठवी-नववीपासून आंदोलन करतोय. २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. कार्यकर्ते थकले आता. शेतकरी पक्षांत विभागला आहे. या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी पद महत्त्वाचं असते. लोकाभिमुख कारभार करता येईल यासाठी पद हवं असते असं सांगत मंत्रिपदाची अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. 

खोकेवाला आमदार हा आरोप वेदनादायी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. खोकेवाले आमदार असा आरोप केला जातो. मला अपंगाचा कैवारी म्हणायचे त्यात खोके शब्द आला ते वेदना देणारं आहे. राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आला आणि भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा आम्ही म्हणायचं का खोके घेतले. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. छत्रपती शिवरायांपासून काही तडजोडीचं राजकारण होत होतं. देवेंद्र फडणवीस अभ्यासू व्यक्ती, एकनाथ शिंदे ग्राऊंड पातळीवर जाऊन काम करतायेत. त्यामुळे ही जोडी एकत्र टिकली तर अनेक कामं मार्गी लागतील. गुवाहाटी ही दुय्यम गोष्ट आहे. ती राजकारणातील रणनीती होती हे लोकांच्या मनातून बाहेर पडलं पाहिजे असं कडू यांनी म्हटलं. ABP माझा कट्टावर ते बोलत होते. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही अडचणीत१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे. राणावर कारवाई व्हावी एवढा तो मोठा नाही. आम्ही तळागाळातून इथपर्यंत पोहचलोय. आम्ही राजकारणात सहज आलो नाही. पैसे कुणाकडून घेतले त्याचे उत्तर आहे का? सत्ता अशीच स्थापन होत असेल तर लोकशाहीचं पतन झालं हा आरोप खराच आहे. माझ्यावर आरोप केले त्यामुळे मी एकटा नाही तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही अडचणीत आलेत असं कडू यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस