शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मला तेव्हाच राग येतो..; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:19 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी झोपतात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे असंही फडणवीस म्हणाले.

मुंबई - दिवाळीनिमित्त आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास भाष्य केले. मी सागर बंगल्यावरच खुश आहे. इथे खूप सकारात्मकता आहे असं सांगत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर दिले आहे. राज्याच्या राजकारणात भाजपानं सत्तांतर घडवलं परंतु उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना शपथ घ्यायला लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मुख्यमंत्रिपदी काम केल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावणं हे अपमानास्पद आहे असं विरोधकांकडून सातत्याने फडणवीसांवर टीका होत होती. 

देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) आज विविध प्रश्नावर भाष्य केले. त्याचसोबत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर फडणवीसांनी म्हटलं की, राज्यमंत्री लवकर केले नाहीत तर कारभारावर त्याचा त्रास होतो त्यामुळे विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी झोपतात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. कारण पहाट असो वा रात्र शिंदे सातत्याने विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात यावर फडणवीस बोलत होते. यावेळी पत्रकारांनी तुम्हाला राग येतो का असा प्रश्न केला असता फडणवीसांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. 

मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मला राग येतो असं फडणवीसांनी सांगितले. सध्या राजकारणात कटुता वाढली आहे हे वास्तव आहे. डोक्यावरील केस गेले तर समजायचं तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगले काम केले. माझ्याकडे खूप सहनशक्ती आहे हे २५ वर्षात तुम्ही पाहिलं असेल. दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलं असेल तोच अंक मी वाचतो. आमचा पायाभूत सुविधांवर भर आहे. आम्ही मुंबादेवी कॉरिडोर उभारणार आहोत असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा