शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको; बीड प्रकरणावर छगन भुजबळ स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:11 IST

राजकारणात कुणावर अन्याय होता कामा नये. जर कुणी दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे असं भुजबळांनी सांगितले. 

मुंबई - मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात, स्वप्नातही येणे शक्य नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी वारंवार केली जातेय पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोललेत. बीड प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार आणि त्यात जे कुणी दोषी सापडतील, मग कुणीही असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. पण या अगोदरच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातोय असा सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबईतील पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, बीडच्या चौकशीत काही बाहेर आलंय का? कुणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी ते चौकशी करतील. मात्र जोपर्यंत या प्रकरणात त्यांचा हात आहे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा का द्यावा आणि मागावा. मला हे योग्य वाटत नाहीत. अशा एका प्रकरणातून मीही गेलोय. २००३ मध्ये तेलगी प्रकरणात त्याला मी पकडले, मोक्का लावला आणि सगळं काही मी केल्यानंतर माझ्यावर आरोप लावण्यात आला. तेव्हा मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही होतो माझा राजीनामा घेण्यात आला. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतानाच मीच सुप्रीम कोर्टात गेलो आणि ती केस सीबीआय दिली. त्यावेळी भाजपा सरकार होते. सीबीआयने त्या खटल्याची पूर्ण चौकशी केली त्यानंतर मी केलेली कारवाई योग्य आहे. तुमचा काहीही दोष नाही असं रिपोर्टमध्ये आले. माझे नावही चार्जशीटमध्ये आले नाही. तरीही उपमुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद गेले, कारण नसताना मनस्ताप झाला. मी हे सगळे भोगले आहे. पुरावा नसताना राजीनामा घेतला गेला. चौकशीत काही सापडले तर तो भाग वेगळा असतो असं त्यांनी सांगितले.

तसेच राजकारणात कुणावर अन्याय होता कामा नये. जर कुणी दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे. जो खून झाला तो अतिशय भयंकर आहे. आमदार धस ज्याप्रकारे सांगतायेत. बाहेर ऐकतोय ते ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. असा खून होणे कल्पनाच करवत नाही. जे दोषी असतील त्यांना फाशी व्हायलाच हवी. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये असे मला वाटते असंही भुजबळांनी सांगितले.

दरम्यान, जरांगे जे काही बोलतायेत ते योग्य नाही. ही लोकशाही आहे ठोकशाही नाही. दोषी असेल तर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याचं कारण नाही. जरांगेंच्या बाबतीत बोलायचं झाले तर मुंडे चार पाच वेळा त्यांचे उपोषण सोडवायला गेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. ते पाहून घेतील. खून अतिशय वाईटरित्या झाला पण हे प्रकरण शांततेने घेतले पाहिजे. चौकशी होऊ द्या. कार्यकर्त्यांच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला कळत नाही ना, कार्यकर्ते चांगले काम करतात त्यांना मानसन्मान दिला जातो. मला कुणाची बाजू घ्यायची नाही परंतु जे काही असेल चौकशीत समोर येऊ द्या असंही छगन भुजबळांनी म्हटलं.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण