शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राजन साळवींना मी फोन केला नाही,  त्यांचाच आला, वैभवलाही...; रामदास कदमांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:50 IST

कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत.

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाचा हात पकडल्याने कोकण पट्ट्यात ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. तिकडे कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत. अशातच शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

राजन यांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांच्याकडे सगळे संपलेले आहे, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. काल मला त्याचा फोन आला होता. आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आमच्यासोबत या म्हणून फोन केला नव्हता. त्यावेळी बोललो असतो तर बदल झाला असता. पण काल भाई मी तुमच्यासोबत येतोय, माझ्यावर लक्ष ठेवा, असे सांगायला फोन केलेला. मी त्याला काही काळजी करू नको असे सांगितले आहे. एवढेच नाही तर वैभव नाईक आणि माझेही संबंध जवळचे आहेत, पण मी त्याला आतापर्यंत कधीही फोन केला नाही, असे सुतोवाच रामदास कदम यांनी दिले आहेत. 

वैभव नाईक यांनी साळवींच्या पक्षप्रवेशावर बोलताना आपण ठाकरे गटातच राहून शिवसेना वाढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतू, रामदास कदमांच्या या वक्तव्याने राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. 

उद्धव ठाकरेंसोबत कोणीच शिल्लक राहणार नाही हे मी आधीच सांगितले होते. राजन साळवींचा पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सणसणीत राजकीय चपराक लावली आहे. अजून पुष्कळ लोक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. हम दो हमारे दो एवढेच शिल्लक राहणार मातोश्रीकडे, असा इशाराही कदम यांनी दिला. 

कधी कधी सत्य हे पचत नसते, तशी अवस्था संजय राऊत आणि विनायक राऊत यांची झाली आहे. जे वास्तव आहे ते शरद पवार बोलले. वास्तव नसते तर शिंदे यांना हा दिवस मिळाला नसता. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद नव्हते. शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे, प्रचंड आहे.  आपण कोणावर काय बोलतो याचं भान संजय राऊत यांनी ठेवलं पाहिजे, असा सल्ला कदम यांनी राऊतांना दिला आहे. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमVaibhav Naikवैभव नाईक Rajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना