शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:28 IST

नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम गेल्या वर्षभरापासून लेकीच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये प्रवेशासाठी धडपड करत आहेत.

नांदेड - लेकीला चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं ती मोठी अधिकारी बनावी असं स्वप्न बाळगणाऱ्या शहीद जवानाच्या वीरपत्नीला अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही निराशा  पदरी पडली आहे. त्यामुळे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी खंत शहीद जवान संभाजी कदम यांच्या वीरपत्नी शीतल कदम यांनी व्यक्त केली आहे.  

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम गेल्या वर्षभरापासून लेकीच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये प्रवेशासाठी धडपड करत आहेत. अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही लेकीला शाळेत प्रवेश मिळत नाही. वर्षभरापासून शाळेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करुनही यश मिळालं नाही. त्यामुळे वीरपत्नी यांनी सांगितले की, जिथे आम्ही गेलो तिथं आम्हाला साधी विचारपूसही केली जात नव्हती. अनेक पत्र घेऊन गेले तरीही उत्तर मिळालं अशी पत्र खूप येतात. याचा फरक पडत नाही अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली. 

संभाजी कदम नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे शहीद जवान आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ रोजी ते शहीद झाले होते. संभाजी कदम यांच्या अत्यंविधीवेळी याच जिल्ह्यातील नव्हे तर आजुबाजुच्या जिल्ह्यातील हजारो लोक दर्शनासाठी आले होते. संभाजी कदम यांना तेजस्विनी नावाची मुलगी आहे तिचं वय ६-७ वर्ष आहे. वीरपत्नी शीतल कदम यांना आपल्या लेकीला चांगलं शिक्षण देऊन मोठं अधिकारी बनविण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी चांगल्या शाळेत तिला प्रवेश मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. 

नांदेडमध्ये प्रसिद्ध ज्ञानमाता विद्याविहार ही नावाजलेली इंग्रजी माध्यमातील शाळा आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात शीतल कदम या शाळेत मुलीच्या प्रवेशासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की, यंदा प्रवेश होऊ शकत नाही तुम्ही जानेवारी महिन्यात या, या महिन्यात शीतल कदम पुन्हा शाळेत गेल्या पण त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे वीरपत्नीने जिल्हा सैनिक कार्यालयाकडून शिफारस घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांना भेट दिली. शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेसाठी पत्र दिलं त्यात लिहिलं होतं की, शीतल कदम या शहीद जवानाच्या वीरपत्नी आहे. त्यामुळे जवानाच्या मुलीला विनाशुल्क शाळेत प्रवेश देण्यात यावा. तरीही शाळेच्या प्रशासनाने या पत्राची दखल घेतली नाही. शाळेचे डोनेशन भरण्यासही तयार आहे असही सांगितलं. वीरपत्नीला शाळेच्या संचालकांना भेटू दिलं नाही. साधी विचारपूसही केली नाही. बसण्यासाठी जागा दिली नाही पिण्यासाठी पाणी दिलं नाही अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा वीरपत्नीचा आरोप आहे. 

वीरपत्नीने सांगितलं की मी शहीद जवानाची पत्नी आहे. तरीही त्याची दखल घेतली नाही. तुम्ही चालते व्हा असं सांगण्यात आलं. त्यामुळे हताश झालेल्या वीरपत्नीने माध्यमाशी बोलताना माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले. ते असते तर आम्ही कसंबसं जगलो असतो. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी निराशादायक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या प्रकरणावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री दखल घेऊन वीरपत्नीला न्याय मिळवून देतील का? या मुजोर शाळेवर कारवाई करणार का? हे पाहणं गरजेचे आहे.   

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाJammu Kashmirजम्मू-काश्मीर