शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मानवतावाद हाच संस्कृतीचा पाया

By admin | Published: January 04, 2016 2:39 AM

भारतीय संस्कृतीची बलस्थाने अनेक असून, प्रत्येक धर्म हा सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो, आयुष्य जगताना मानवी मूल्ये ही महत्त्वाची असून, मानवतावाद हाच भारतीय संस्कृतीचा प्रमुख पाया आहे

मुंबई : भारतीय संस्कृतीची बलस्थाने अनेक असून, प्रत्येक धर्म हा सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो, आयुष्य जगताना मानवी मूल्ये ही महत्त्वाची असून, मानवतावाद हाच भारतीय संस्कृतीचा प्रमुख पाया आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सायन येथील सोमय्या मैदानावर श्रीमद विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज लिखित ‘मारुं भारत, सारुं भारत’ ग्रंथाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.डॉ. मोहन भागवत म्हणाले की, ‘प्राचीन संस्कृतीचा प्रसार प्रथमत: भारतातच होणे गरजेचे असून, त्यानंतर तो विदेशात करणे गरजेचे आहे. आपल्या देशात विविध धर्म, संस्कृती नांदत असून, हे सर्व धर्म आपणाला सत्य आणि अंहिसेचाच मार्ग दाखवितात. भारतवर्षाला खरोखरच प्रगत बनवायचे असेल, तर प्रथमत: तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही भागवत यांनी यावेळी नमूद केले.१ जानेवारीपासून सुरू झालेला हा कार्यक्रम १० जानेवारीपर्यंत रंगणार आहे. ‘मारुं भारत, सारुं भारत’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ््याच्या निमित्ताने सोमय्या मैदानावर मोठे देखावे उभारण्यात आले आहेत, शिवाय नक्षीकामाने सजलेले असे ४०० फूट लांब व ६० फूट उंच असे प्रवेशद्वार येथे उभारण्यात आले आहे. शंखेश्वर तीर्थस्थान, विशाल प्रवचन मंडप, माँ सरस्वती मंदिर, साधू-साध्वीसाठीकुटीर आणि अतिथींच्या भोजन व्यवस्थेसाठी विशाल भोजन मंडप उभारण्यात आलेला आहे.रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमाला डॉ. मोहन भागवत उपस्थित होते, तर सकाळी दहा वाजता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल उपस्थित राहिल्या होत्या. श्रीमद विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचा ‘मारुं भारत, सारुं भारत’ हा ३०० वा ग्रंथ असून, हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी या चार भाषांमध्ये तो प्रकाशित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)