शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बारावीचा निकाल लांबणीवर ? शिक्षकांचा बहिष्कार : ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:27 IST

शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे.

मुंबई : शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. परिणामी, राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या तब्बल ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असून त्यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता विविध शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे.शासनादेश निघत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले की, आजघडीला शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासलेली नाही. आंदोलन लांबल्यास त्याचा परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची भीती देशमुख यांनी व्यक्त केली आहे. राज्यात बारावीचे १५ लाख विद्यार्थी आहेत. आणखी दोन दिवस आंदोलन सुरू राहिल्यास ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे कठीण होणार आहे.निकाल वेळेतच लागणार!मंडळाने शिक्षकांना सहकार्याचे आवाहन केलेले आहे. यासंदर्भातील बैठक मंत्रालयात मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी होईल. त्यात शिक्षकांच्या मागण्यांवर निश्चित तोडगा काढला जाईल. त्यामुळे बारावीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही.- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळलेखी आश्वासनावर विश्वास नाही!१५ दिवसांत शासन आदेश काढण्याचे सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे आता शासन आदेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. निकालास दिरंगाई झाल्यास शासन जबाबदार असेल.- प्रा. अनिल देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

टॅग्स :Teacherशिक्षकexamपरीक्षा