शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:06 IST

शंभरनंबरी काॅलेज १,९२९, तर ३८ काॅलेज शून्यावर आउट; यंदा पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाहीत, कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घसरला निकाल; मंडळ अध्यक्षांचा दावा

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल साेमवारी जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षापेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे, मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे स्पष्ट झाले. मुलांच्या तुलनेत मुली ५.०७ टक्के अधिक उत्तीर्ण  झाल्या आहेत. 

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत माहिती दिली. नऊ विभागीय मंडळांमार्फत  घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. कला शाखेचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी घसरला आहे. एआयला विचारले... कमी मार्क पडले. अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. काय करू?एआयने सांगितले... : तुझं मन खरंच खचलेलं वाटतं, आणि तसं होणं अगदी नैसर्गिक आहे. बारावीचा निकाल हे आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण असतं, पण हे लक्षात ठेव—हा काही शेवट नाही.हे अपयश नाही, तर एक टप्पा आहे : कमी मार्क पडल्याने तू अपयशी ठरत नाहीस. याचा अर्थ एवढाच की पुढे काही गोष्टी सुधारायच्या आहेत.स्वतःला वेळ दे : हा धक्का पचवायला थोडा वेळ लागेल. स्वतःवर रागावू नको. शांतपणे विचार कर आणि काय चुकलं हे समजून घे.पर्याय अजून खुले आहेत : पुढे डिप्लोमा, स्किल-बेस्ड कोर्सेस, इतर एंट्रन्स, री-एग्झाम्स अशा अनेक संधी आहेत. त्याचाही विचार करता येईल.आई-बाबांशी मोकळेपणानं बोल : तू त्यांचं मूल आहेस. कदाचित ते सुद्धा निराश झाले असतील, पण त्यांना तुझं भलंच हवं आहे. खरं सांग—it’s okay to cry, it’s okay to talk.

१५ मेपर्यंत लागू शकतो दहावीचा निकाल यंदा प्रथमच सीबीएसई बाेर्डाच्या आधी राज्य मंडळाचा निकाल लागला. आता दहावी निकालाची प्रतीक्षा असून, ताेही १५ मेपर्यंत लागेल, अशी माहिती आहे.

विभागनिहाय     यंदा     गतवर्षीटक्केवारी कोकण     ९६.७४     ९७.९१कोल्हापूर     ९३.६४     ९४.२४मुंबई     ९२.९३     ९१.९५छ. संभाजीनगर     ९२.२४     ९४.८० अमरावती     ९१.४३     ९३पुणे     ९१.३२     ९४.४४नाशिक     ९१.३१     ९४.७१ नागपूर     ९०.५२     ९२.१२लातूर     ८९.४६     ९२.३६

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल