शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 06:09 IST

‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे :  ‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ‘कोरोना’सारखे आव्हान परतवून लावल्यावर आता आणखी कसली भीती? आता कोणतीही परीक्षा असली तरी आपण मार्ग काढू शकतो. तेव्हा, चिंता करायची नाही. मस्त पेपर द्यायचे!

राज्यातून एकूण १४,७२,५७४ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ३ लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाच्या माहितीनुसार, मुंबईत ५०५ मुख्य केंद्रे तर ७७७ उपकेंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात एकूण ६७ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. 

समुपदेशन सेवा परीक्षा काळातही कार्यरत राहणार 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे वर्षभरानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रचलित पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत.

या पेपरच्या वेळात बदल 

राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च या दिवशी होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

अडचण आल्यास समुपदेशन उपलब्ध 

एससीईआरटी आणि मुंबई विभागीय मंडळाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण आल्यास किंवा शंका निरसनासाठी विद्यार्थी या समुपदेशकांना संपर्क करू शकणार आहेत. मुंबईत ३५, पूर्व मुंबईत १, उत्तर मुंबईत ११, दक्षिण मुंबईत ९, मुंबई उपनगरात १७ तर पश्चिम मुंबईत १५ समुपदेशकांची नोंदणी करण्यात आली आहे.  प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षाकाळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

शाखानिहाय मुंबईतील विद्यार्थीसंख्या 

विज्ञान - ९९०९४कला - ५०८४५वाणिज्य - १८०४९५व्होकेशनल - ४४७८आयटीआय - १०८

मुंबई विभागातील जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे

केंद्र - उपकेंद्र - परिरक्षक 

ठाणे -  १५८- २५२- १३ पालघर -५३- १५५- ११ रायगड- ४६- १४४- १५ मुंबई (दक्षिण )- ६४- ५६ - ७

मुंबई (पश्चिम)- १०८ -८८- १३ मुंबई (उत्तर)- ७६- ८२ - ८

एकूण- ५०५-७७७- ६७

परीक्षार्थींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. काळजी करण्याचे काही कारण नाही. पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मुलांना मानसिक आधार द्यावा. - वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण