शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 06:09 IST

‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे :  ‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ‘कोरोना’सारखे आव्हान परतवून लावल्यावर आता आणखी कसली भीती? आता कोणतीही परीक्षा असली तरी आपण मार्ग काढू शकतो. तेव्हा, चिंता करायची नाही. मस्त पेपर द्यायचे!

राज्यातून एकूण १४,७२,५७४ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ३ लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाच्या माहितीनुसार, मुंबईत ५०५ मुख्य केंद्रे तर ७७७ उपकेंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात एकूण ६७ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. 

समुपदेशन सेवा परीक्षा काळातही कार्यरत राहणार 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे वर्षभरानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रचलित पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत.

या पेपरच्या वेळात बदल 

राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च या दिवशी होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

अडचण आल्यास समुपदेशन उपलब्ध 

एससीईआरटी आणि मुंबई विभागीय मंडळाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण आल्यास किंवा शंका निरसनासाठी विद्यार्थी या समुपदेशकांना संपर्क करू शकणार आहेत. मुंबईत ३५, पूर्व मुंबईत १, उत्तर मुंबईत ११, दक्षिण मुंबईत ९, मुंबई उपनगरात १७ तर पश्चिम मुंबईत १५ समुपदेशकांची नोंदणी करण्यात आली आहे.  प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षाकाळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

शाखानिहाय मुंबईतील विद्यार्थीसंख्या 

विज्ञान - ९९०९४कला - ५०८४५वाणिज्य - १८०४९५व्होकेशनल - ४४७८आयटीआय - १०८

मुंबई विभागातील जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे

केंद्र - उपकेंद्र - परिरक्षक 

ठाणे -  १५८- २५२- १३ पालघर -५३- १५५- ११ रायगड- ४६- १४४- १५ मुंबई (दक्षिण )- ६४- ५६ - ७

मुंबई (पश्चिम)- १०८ -८८- १३ मुंबई (उत्तर)- ७६- ८२ - ८

एकूण- ५०५-७७७- ६७

परीक्षार्थींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. काळजी करण्याचे काही कारण नाही. पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मुलांना मानसिक आधार द्यावा. - वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण