शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 06:09 IST

‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे :  ‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ‘कोरोना’सारखे आव्हान परतवून लावल्यावर आता आणखी कसली भीती? आता कोणतीही परीक्षा असली तरी आपण मार्ग काढू शकतो. तेव्हा, चिंता करायची नाही. मस्त पेपर द्यायचे!

राज्यातून एकूण १४,७२,५७४ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ३ लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाच्या माहितीनुसार, मुंबईत ५०५ मुख्य केंद्रे तर ७७७ उपकेंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात एकूण ६७ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. 

समुपदेशन सेवा परीक्षा काळातही कार्यरत राहणार 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे वर्षभरानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रचलित पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत.

या पेपरच्या वेळात बदल 

राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च या दिवशी होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

अडचण आल्यास समुपदेशन उपलब्ध 

एससीईआरटी आणि मुंबई विभागीय मंडळाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण आल्यास किंवा शंका निरसनासाठी विद्यार्थी या समुपदेशकांना संपर्क करू शकणार आहेत. मुंबईत ३५, पूर्व मुंबईत १, उत्तर मुंबईत ११, दक्षिण मुंबईत ९, मुंबई उपनगरात १७ तर पश्चिम मुंबईत १५ समुपदेशकांची नोंदणी करण्यात आली आहे.  प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षाकाळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

शाखानिहाय मुंबईतील विद्यार्थीसंख्या 

विज्ञान - ९९०९४कला - ५०८४५वाणिज्य - १८०४९५व्होकेशनल - ४४७८आयटीआय - १०८

मुंबई विभागातील जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे

केंद्र - उपकेंद्र - परिरक्षक 

ठाणे -  १५८- २५२- १३ पालघर -५३- १५५- ११ रायगड- ४६- १४४- १५ मुंबई (दक्षिण )- ६४- ५६ - ७

मुंबई (पश्चिम)- १०८ -८८- १३ मुंबई (उत्तर)- ७६- ८२ - ८

एकूण- ५०५-७७७- ६७

परीक्षार्थींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. काळजी करण्याचे काही कारण नाही. पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मुलांना मानसिक आधार द्यावा. - वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण