शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

बारावीचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:54 IST

अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे.

पुणे : अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तज्ज्ञ, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून १० मे २०१९ पर्यंत आॅनलाइन सूचना, शिफारशी मागविण्यात आल्या आहेत. ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येतील.महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना व त्यास अनुसरून नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या अभ्यासक्रमाची मांडणी ही नव्याने क्षमता विधानांच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. अकरावीचा विचार करता विषयाचे प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे. बारावीसाठी विषयाचे उपयोजनात्मक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्याचा अवलंब करावा हा विचार ठेवण्यात आलेला आहे.अभ्यासक्रमाची मांडणी ही क्षमता विधानांच्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असल्याचे बालभारतीने म्हटले आहे. फक्त विषयज्ञानात भर घालण्यापेक्षा त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने होणाऱ्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमांबाबत शिफारशी, सूचना पाठविण्याचे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र