शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादर विभागात ८० वर्षांपासून असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस सरकारने पाठविली आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकार हमालांनी बांधलेले ८० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडायला निघाले आहेत. हे कुठले हिंदुत्व आहे? हिंदूंना भयभीत करून त्यांची मते घ्यायची. इतकेच त्यांचे हिंदुत्व शिल्लक उरले आहे का? असा सवाल उद्धवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते. अशा वेळी फडणवीस यांचे हिंदुत्व काय करत आहे? रामाचे मंदिर उभारले; पण त्याच रामभक्त हनुमानचे मंदिर कसे तोडता? ‘एक है तो सेफ है’, म्हणता; पण बांगलादेशातील, मुंबईतील मंदिरे सेफ नाहीत. वन नेशन, वन इलेक्शन सगळे नंतर पाहता येईल; पण आता मंदिरे सुरक्षित नाहीत. हिंदुत्व सोडले असे आम्हाला विचारता, मग तुम्ही हे काय सोडले आहे, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. बांगलादेशात मंदिरे जाळली जात आहेत. तिथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. जे हिंदुत्व, हिंदुत्व करतात त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? भाजपकडे फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व उरले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

रेल्वेकडून हनुमान मंदिराला नोटीस बजावल्याची माहिती मिळताच प्रत्येक भक्ताच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडू देणार नाही. यासाठी लढण्यास पूर्णपणे तयार आहोत    - प्रकाश कारखानीस,     विश्वस्त, हनुमान मंदिर 

हिंदुत्वाविषयी ठाकरेंचे बेगडी प्रेमउद्धव ठाकरे यांनी हिंदूंविषयी आपल्या भावना व्यक्त करू नयेत, त्यांचे हिंदू आणि हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असेही ते म्हणाले. 

आधी पाच वेळा नोटीस दादर येथील हनुमान मंदिराला याआधी पाचवेळा नोटीस पाठविली त्यावेळी आमचे सरकार नव्हते. आता नोटीस पाठविली म्हणजे मंदिर तोडले असे होत नाही. केंद्र व राज्य सरकार यात लक्ष घालेल आणि निश्चितच मंदिराचे रक्षण करणे किंवा त्यांची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने करणे, ही आमची जबाबदारी असून, जराही मागे हटणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस