शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादर विभागात ८० वर्षांपासून असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस सरकारने पाठविली आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकार हमालांनी बांधलेले ८० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडायला निघाले आहेत. हे कुठले हिंदुत्व आहे? हिंदूंना भयभीत करून त्यांची मते घ्यायची. इतकेच त्यांचे हिंदुत्व शिल्लक उरले आहे का? असा सवाल उद्धवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते. अशा वेळी फडणवीस यांचे हिंदुत्व काय करत आहे? रामाचे मंदिर उभारले; पण त्याच रामभक्त हनुमानचे मंदिर कसे तोडता? ‘एक है तो सेफ है’, म्हणता; पण बांगलादेशातील, मुंबईतील मंदिरे सेफ नाहीत. वन नेशन, वन इलेक्शन सगळे नंतर पाहता येईल; पण आता मंदिरे सुरक्षित नाहीत. हिंदुत्व सोडले असे आम्हाला विचारता, मग तुम्ही हे काय सोडले आहे, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. बांगलादेशात मंदिरे जाळली जात आहेत. तिथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. जे हिंदुत्व, हिंदुत्व करतात त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? भाजपकडे फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व उरले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

रेल्वेकडून हनुमान मंदिराला नोटीस बजावल्याची माहिती मिळताच प्रत्येक भक्ताच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडू देणार नाही. यासाठी लढण्यास पूर्णपणे तयार आहोत    - प्रकाश कारखानीस,     विश्वस्त, हनुमान मंदिर 

हिंदुत्वाविषयी ठाकरेंचे बेगडी प्रेमउद्धव ठाकरे यांनी हिंदूंविषयी आपल्या भावना व्यक्त करू नयेत, त्यांचे हिंदू आणि हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असेही ते म्हणाले. 

आधी पाच वेळा नोटीस दादर येथील हनुमान मंदिराला याआधी पाचवेळा नोटीस पाठविली त्यावेळी आमचे सरकार नव्हते. आता नोटीस पाठविली म्हणजे मंदिर तोडले असे होत नाही. केंद्र व राज्य सरकार यात लक्ष घालेल आणि निश्चितच मंदिराचे रक्षण करणे किंवा त्यांची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने करणे, ही आमची जबाबदारी असून, जराही मागे हटणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस