शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम झाले तरी किती? कधीपर्यंत पूर्णपणे सुरू होणार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:34 IST

कोणत्याही स्थितीत जून २०२३ रोजी हा संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

अतुल कुलकर्णी -

मुंबई: देशातील सर्वाधिक ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी ४४० किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून, त्यापैकी सलग २१० किलोमीटर पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे रोजी होणार आहे. कोणत्याही स्थितीत जून २०२३ रोजी हा संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

१) नागपूर ते सेलू बाजार हे २१० किमीचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धीचे आतापर्यंत पूर्ण झालेले कामदेखील देशात सगळ्यात जास्त आहे.२) सेलू बाजार ते मालेगाव या २८ किमीसाठी राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता वापरावा लागेल. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण होईल.२ -अ) मालेगाव ते दुसरबीड हा ८० किमीचा महामार्ग पूर्ण झाला असून दुसरबीड ते सिंधखेडराजा या २० किमीसाठी राष्ट्रीय महामार्गाचा वळणरस्ता वापरावा लागेल.२ -ब) दुसरबीड ते सिंदखेडराजा या २० किमीच्या समृद्धी महामार्गाचा भाग १५ जूनपासून वाहतुकीस खुला होईल.३) सिंदखेडराजा ते वैजापूर हे १५० किमीचे काम पूर्ण झाले आहे.४) पुढे वैजापूर ते शिर्डी ३२ किमीचा वळण रस्ता वापरावा लागणार आहे. हा रस्ता १५ जून रोजी पूर्ण होणार आहे.५) शिर्डी ते सिन्नर हा ४५ किमीचा रस्ता ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.६) सिन्नर ते इगतपुरी हा ५८ किमीचा रस्ता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.७) इगतपुरी ते भिंवडी हा ७८ किमीचा रस्ता जून २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्रातच मुंबई- पुणे हा ९४.६ किमी लांबीचा महामार्ग आहे. ज्याचे काम १ जानेवारी १९९८ मध्ये सुरू झाले. काही वळण रस्त्यांसह ते १ डिसेंबर २००० रोजी पूर्ण झाले आणि उर्वरित संपूर्ण काम १ मार्च २००२ रोजी पूर्ण झाले होते. 

दिल्ली ते मुंबई आधी नागपूर ते मुंबई पूर्ण हाेणार -देशात दिल्ली ते मुंबई हा १२०० किमीचा महामार्ग होणार आहे.  मात्र, त्या आधीच राज्यातील ७०१ किमी लांबीचा महामार्ग पूर्ण होणार आहे. 

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMumbaiमुंबईnagpurनागपूर