शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन नेमके किती, आकडेवारी मिळेना!

By admin | Updated: March 18, 2017 00:47 IST

७० हजार कोटी खर्च करुनही सिंचन झाले नाही, मग हा पैसा गेला कुठे? असा सवाल आघाडी सरकारला विरोधकांकडून विचारला जात होता. आता भाजपा शिवसेनचे सरकार आले

- अतुल कुलकर्णी,  मुंबई७० हजार कोटी खर्च करुनही सिंचन झाले नाही, मग हा पैसा गेला कुठे? असा सवाल आघाडी सरकारला विरोधकांकडून विचारला जात होता. आता भाजपा शिवसेनचे सरकार आले तरी राज्यात नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आहे याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध करुन देता आलेली नाही. २०१४-१५ साली एकूण सिंचित क्षेत्र किती याचे उत्तर ‘उपलब्ध नाही’ असे आर्थिक पहाणी अहवालात देण्यात आले७० हजार कोटी खर्च करुन अवघे दोन टक्के सिंचन झाले असा आक्षेप घेण्यात आल्याने राष्ट्रवादीवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली. दोन्ही काँग्रेसच्या या दुहीचा फायदा घेत भाजपाने राज्यभर आघाडीविरुध्द जोरदार प्रचार मोहीम राबवली. सत्तेवर आल्यानंतर सिंचन विभागाला गती देणार, सिंचनाला पैसे कमी पडू देणार नाही, सिंचनाच्या कामात पारदर्शकता आणणार, अशा घोषणा युती सरकारने केल्या खऱ्या पण प्रत्यक्षात युती सरकारला देखील किती क्षेत्र सिंचनाखाली आणले गेले याची आकडेवारी देता आलेली नाही. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचनासाठी जेवढी तरतूद केली गेली त्यात एक रुपयाही कमी न करता सगळाच्या सगळा निधी वितरीत केला होता. तरीही आकडेवारी गोळा करण्यात भाजपा सरकारला अपयश आले आहे. सिंचीत क्षेत्रात विहीरी, इतर साधने, निव्वय क्षेत्र व एकूण क्षेत्र किती तसेच ओलिताखालील पिकांची सघनता, सिंचन विहीरींची संख्या, दर विहीरीमागे सिंचित निव्वळ क्षेत्र आणि स्थूल सिंचित क्षेत्राची पिकांखालील स्थूल क्षेत्राशी टक्केवारी या सगळ्यांचे उत्तर ‘‘उपलब्ध नाही’’ असे देण्यात आले आहे.आर्थिक पहाणी अहवाल हा राज्याच्या आर्थिक कारभाराचा आरसा असतो. त्या अनुषंगाने पाहिल्यास अनेक विभागांची धक्कादायक माहिती यात आली आहे. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातून होणारी निर्यात ४,३६,४३५ कोटींची होती ती २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर कमी होऊन २,९५,९७६ कोटींवर आली आहे. त्याशिवाय २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये तांदूळ, बाजरी, तूर, उडीद, भूईमूग, सोयाबीन, करडई आणि ऊस या सगळ्या पिकांचे उत्पादन कमी झाल्याचे हा अहवाल सांगतो.खासगी सावकार वाढलेखासगी सावकारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला होता. मात्र २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये राज्यात परवानाधारक खासगी सावकारांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती यातून पुढे आली आहे. सरकारने नवीन खासगी सावकारी करण्यासाठी परवाने वाढवून दिले त्यामुळे खासगी सावकाराकडे जाऊन कर्ज घेणाऱ्यांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली. खालील आकडेवारीतपशील२०१५२०१६परवाना धारक १२,०२२१२,२०८नवीन परवाने१,५८९१,९४७रद्द केलेले४७७७१९कर्ज (कोटी)८९६.३४१२५४.९७कर्जदार ७,०४,४५२ १०,५६,२७३(आकडेवारी कोटीत)