शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

आरक्षणामधून निवडलेल्या किती जणींनी महिला अजेंड्यावर प्रश्न मांडले? डॉ. नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 12:34 IST

३३ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांचे राजकारणात येण्याचे प्रमाण वाढले.

ठळक मुद्देमाजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमाला  

पुणे : स्त्री ही एक अत्यंत प्रभावी मतदार आहे. महिलांना मतदानाचा अधिकार उपकार म्हणून मिळाला नाही, तर समान स्थान देण्यासाठी मिळाला आहे. ३३ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांचेराजकारणात येण्याचे प्रमाण वाढले. मात्र आरक्षण फायदा घेऊन निवडुन गेलेल्या किती महिलांनी महिला अजेंड्यावर प्रश्न मांडले, असा प्रश्न विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आयोजित माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमालेत ‘स्त्री आणि राजकारण’ या विषयावर त्या बोलत होत्या. मसापचे  प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीतराजे पवार यावेळी उपस्थित होते.  दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भारतातील स्त्रिया पुढारलेल्या आहेत. हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. राजकारणात हिंसाचार आणि चारित्र्यहनन या सर्वात मोठ्या संकटांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. प्रत्येक पक्षाने महिलांना गटनेता म्हणून संधी दिली पाहिजे. महापालिकेतील महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद देखील आम्हाला देण्यात यावीत, अशाही मागण्या आता स्त्रियांकडून होऊ लागल्या आहेत. राजकीय तिकिट देताना आपण कामात किती बसतो, यापेक्षा कोणत्या वर्गातून आरक्षण मिळेल याचा विचार केला जातो. आरक्षणाच्या भूमिकेतून राजकीय अपरिहर्यात निर्माण झाली आहे. राजकारणात काम करणाऱ्या महिलांमध्ये अकरा गुण आवश्यक आहेत. त्यामध्ये पक्षाची उतरंड स्विकारावी, कार्यक्षमता, विश्वास मिळवणे, कामात सातत्य, वाचन व अभ्यास, धाडस, नेतृत्व, धोरणात्मक निर्णयांना कामातून उत्तर, माध्यमांची साथ, इव्हेंट न करता उपयुक्त काम करणे, रस्त्यावर उतरून आपले काम दाखविले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.  डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पराकोटीचे स्त्रियांचे शोषण होत असल्याने महिला संघटना निर्माण झाल्या. दलित महिला देखील संघटित होऊन स्थानिक पातळीवर काम करू लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्या होत्या. त्यातून महिलांची राजकीय जागृता वाढण्यास मदत झाली. राजकीय पटलावर अनेक पदावर महिला काम करताना पाहून खूप आनंद होतो. पण पतीच सर्व कारभार पाहू लागल्याचे चित्र समोर आल्याने आता तरी स्त्रियांना मुक्त कारभार करण्याची संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा र्डा. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. राजकारणात हजारमधील चार-पाच महिला सक्रिय राहतात. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्या मागे पडतात. तर काही महिला सामाजिक आणि पक्षीय पातळीवर घर सांभाळून काम करीत असून पक्षातूनच हल्ले करण्याचाही प्रयत्न असतो. पण मला शिवसेनेत असा अनुभव आला नाही. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ग्रामीण भागात प्रश्नांसाठी लढणाऱ्या सामान्य महिला या राजकारणाच्या कणा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणWomenमहिलाElectionनिवडणूकreservationआरक्षण