शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

किती जणांची माफी मागणार आहात?; छगन भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 12:55 IST

दिलीप वळसे पाटील का गेले? अनेक वर्ष दिल्लीत खासदार असलेले प्रफुल पटेल का गेले? याचा विचार करायला पाहिजे असं भुजबळ म्हणाले.

नाशिक – मी चुकलो असं म्हणत शरद पवारांनी माफी मागितली. मात्र मागे एका प्रशासकीय संकुलाच्या उद्धाटनाला शरद पवार म्हणाले होते की, बारामतीनंतर जर कुठल्या मतदारसंघाचा विकास झाला असेल तर तो येवल्याचा आहे. इथल्या लोकांनी मला सतत निवडून दिलं कारण मी इथं विकास केलाय. काम केले. पण शरद पवार याच मतदारसंघात का आले? ओबीसीचा नेता असल्याने शरद पवार इथं आले असावे. शरद पवार किती ठिकाणी माफी मागणार आहात? पुण्यापासून बीडपर्यंत, गोंदियापासून लातूरपर्यंत ५० वेळा माफी मागणार आहे का? असा पलटवार मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केला.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांच्या घरातूनच हे झाले ना. ६१-६२ वर्ष जे सोबत होते ते अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. ही सगळी मंडळी का गेली? दिलीप वळसे पाटील का गेले? अनेक वर्ष दिल्लीत खासदार असलेले प्रफुल पटेल का गेले? याचा विचार करायला पाहिजे. छगन भुजबळ यांनी हे सगळे घडवून आणले असं पवारांना वाटते. ही चुकीची माहिती आहे. २०१४ मध्येच जर भाजपाने शिवसेनेला सोडले तर आम्ही काँग्रेसला सोडू असं शरद पवारांनी ठरवले होते. त्यानंतर सरकारमध्ये राष्ट्रवादीचा सहभाग होईल असं पवारांनी म्हटलं होते. पहिल्यापासून भाजपासोबतच्या चर्चा प्रफुल पटेल, अजित पवार, शरद पवार हीच मंडळी करत होती असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.

तसेच जे राष्ट्रवादी काँग्रेसच्याविरोधात भूमिका घेतात ते शरद पवारांच्या स्टेजवर होते. २-३ ज्येष्ठ मंडळी होते त्यांच्या घरातील तरूण मुले माझ्या स्वागतासाठी आली होती. पक्षाविरोधात काम करणारे अनेक मंडळी व्यासपीठावर होती. २००४ ला शरद पवारांनी सांगितले तुम्हाला निवडणुकीत उभे राहावे लागेल. त्याअगोदार मी मुंबईतून दोनदा शिवसेनेच्या तिकिटावर माझगाव येथून निवडून आलो होतो. १९८५ मध्ये मी शिवसेनेचा नेता होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीत आल्यावर नेता झालो नव्हतो. मुंबई शहरात आमदार, महापौर होतो असंही भुजबळांनी सांगितले.

...मला विनाकारण राजीनामा द्यायला सांगितला

२००३ मध्ये तेलगीला मीच गृहमंत्री असताना अटक केली होती. त्याच्यावर मोक्का लावला. पण मीच काहीतरी केल्याचे आरोप लावला. मला राजीनामा देण्यास साहेबांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने तेलगी प्रकरण सीबीआयकडे सोपवा हे सांगितले. सीबीआयकडे केस गेली. मला आणि समीर भुजबळ यांना एकदा-दोनदा चौकशीला बोलावले. त्यावेळी भाजपा सरकार दिल्लीत होते. सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले त्यात भुजबळ नाव कुठेही नव्हते. मला विनाकारण राजीनामा द्यायला सांगितला होता असं भुजबळांनी म्हटलं.

येवल्याची निवड मी केली, शरद पवारांनी नाही

मी जुन्नरमधून लढावे असं शरद पवारांनी सांगितले. त्याठिकाणी माझ्या वडिलांचे गाव त्याचसोबत मी भायखळा भाजी मंडईचा अध्यक्ष होतो. तिथली सगळी मंडळी जुन्नरची होती. साहेबांचे पुणे आणि जिल्ह्यावर लक्ष होते. त्यामुळे जुन्नरमधून मी लढावे असे त्यांनी म्हटलं. परंतु येवला विधानसभेची स्थिती ठीक नव्हती. मी स्वत: येवल्याची निवड केली होती. शरद पवारांनी मला येवल्यात पाठवले नव्हते. येवला तालुका दुष्काळग्रस्त होता. त्याठिकाणी दोनदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. परंतु येवलाकरांनी प्रेम दिले आणि संघर्षातून मी ४ वेळा या मतदारसंघातून निवडून दिले असंही प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवार