शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:14 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री ठरवण्यासाठी महायुतीचे नेते सातत्याने बैठका घेत आहेत.

काल(दी.28) रात्रीदेखील गृहमंत्री अमित शाहांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही, असा दावा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नावावर अजूनही सस्पेन्स कायम आहे, त्यामुळे आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, किती दिवसांत शपथविधी होणे बंधनकारक आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाले नाही तर, पुढे राज्यपाल काय कारवाई करतात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

नवीन मुख्यमंत्र्यांची शपथ किती दिवसांत घेणे बंधनकारक आहे?सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष पांडे म्हणतात, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर किती दिवसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे बंधनकारक आहे, याबाबत भारतीय राज्यघटनेत कोणताही स्पष्ट नियम नाही. साधारणपणे कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 1 ते 7 दिवसांत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाते किंवा शपथ घेण्याची प्रक्रियाही पूर्ण होते. 

कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर अशा परिस्थितीत राज्यपाल सर्वाधिक उमेदवार जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करण्यास सांगतात. जर सर्वाधिक उमेदवार जिंकणारा राजकीय पक्ष राज्यात सरकार स्थापन करू शकत नसेल, तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. पणष राज्यात सरकार स्थापनेला बराच विलंब होत असेल, तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार राज्यपालांना नक्कीच आहे. 

भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 मध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा राष्ट्रपती, राज्यपालांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर किंवा राज्याचे सरकार घटनेच्या तरतुदींनुसार चालवता येत नसेल, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वैध असते, परंतु आवश्यक असल्यास ती 6 महिन्यांपासून जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत वाढवता येते. महाराष्ट्राच्या बाबतीत अशी स्थिती दिसत नसून, येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे नाव समोर येईल, असा दावा केला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री