शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकतात? उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 23, 2015 09:25 IST

सरकार बदललं तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकताता असा सवाल विचारत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन याच सरकारने पाकचे शेपूट कापलं पाहिजे अस ठाम मत उद्धव ठाकरे यांनी मांडल आहे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३  - सरकार बदललं तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकताता असा सवाल विचारत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन याच सरकारने पाकचे शेपूट कापलं पाहिजे अस ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडल आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील मुलाखतीमधून उद्धव यांनी पाकिस्तान, शेतकरी कर्जमाफी , अच्छे दिन अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले. 

पाकिस्तानकडे गमावण्यासारखं काहीही नाहीये, त्यांच्या देशात सावळा गोंधळच चालू असल्याचे उद्धव म्हणाले. त्यामुळे 'पाकिस्तानने अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिलेली असताना सरकारनेही त्यांना जशास तस उत्तर द्यायला हवे असे सांगत राष्ट्रहिताशी कोणतीही तडजोड न करता पाकिस्तानशी मुकाबला करा' असा सल्ला उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. तसेच काश्मीरमध्ये असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षासोबत असलेल्या भाजपाच्या युतीबाबतही उद्धव यांनी सवाल उपस्थित केला आहे. 'राज्यात येऊन युतीचे राजकारण पुरे करा असं सांगणा-या भाजपाध्यक्षांना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती कशी चालते' असा खोचक प्रश्न विचारत या अनाकलनीय युतीचं गणित समजत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. 
या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारने जनतेला दिलेल्या 'अच्छे दिना'च्या वायद्याची आठवण करून देतानाच ' लोकांना फसवता येणार नाही, अशी टीकाही केली आहे. तसेच लोकांना मोदींकडून मोठ्या अपेक्षा असून जनतेचा विश्वास तुटू न देण्याचा व कामाचा वेग वाढवण्याचा सल्लाही सरकारला दिला आहे. 
राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्तीच्या मुद्यावरही उद्धव यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. ' शेतक-यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत.  माफी ही गुन्हेगारांना दिली जाते, त्यामुळे  कर्जमाफी द्यायला शेतकरी गुन्हेगार वाटले काय? असा सवाल विरोधकांना विचारत ' शेतक-याला कर्जमुक्त तर केल पाहिजेचं आणि त्याने पुन्हा कर्ज काढल्यास ते कर्ज फेडण्याची ताकद त्याला दिली पाहिजे' अशी भूमिकाही उद्धव यांनी मांडली.