शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

उद्योगांच्या जमिनींवर उभी राहणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 05:57 IST

उद्योग बंद झाल्याने पडून असलेल्या जमिनींवर घरांची उभारणी करण्यास अनुमती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला गती मिळेल.

मुंबई : उद्योग बंद झाल्याने पडून असलेल्या जमिनींवर घरांची उभारणी करण्यास अनुमती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला गती मिळेल.यामुळे वर्षानुवर्षे पडून असलेल्या बड्या उद्योगपतींच्या जमिनींवर सिमेंटचे इमले उभे राहतील. जमिनी गृहनिर्माण व व्यावसायिक वापरासाठी खुल्या करताना, मूळ चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) २० टक्के क्षेत्रफळाएवढे बांधकाम क्षेत्र हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी घरे बांधण्यासाठी राखीव ठेवावे लागेल. या जागेवर परवडणारी घरे बांधून म्हाडाने मंजूर केलेल्या लाभार्र्थींना ती वितरित करणे बंधनकारक असेल.मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रात उद्योग बंद पडल्याने विनावापर पडून असलेल्या प्रचंड जागा असून, त्यापैकी बहुतेक जमिनीची मालकी ही बडे उद्योगपती, धनवंतांकडे आहे. त्यांना गृहनिर्माणाची परवानगी देतानाच, परवडणाºया घरांची निर्मिती बंधनकारक करीत सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे.अनेक कंपन्यांनी १९७० पूर्वी वा त्यानंतर आपले उद्योग उभारले. त्यासाठीच्या जमिनी राज्य सरकारने संपादित केल्या आणि कंपन्यांनी त्या खरेदी केल्या होत्या. पुढे त्यातील बरेच उद्योग बंद पडले वा बरेच उद्योग प्रदूषण वा इतर कारणांनी शहराबाहेर स्थलांतरित झाले.अशा जमिनींसंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींआधारे निर्णय घेण्यात आला. भूसंपादनाबाबतच्या विक्री, गहाण, दान, भाडेपट्टा किंवा हस्तांतरणाबाबतचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आले असून, बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनीबाबतची संदिग्धता दूर होऊन, त्याच्या वापराबाबत सुसूत्रीकरण होणार आहे.

टॅग्स :Homeघर