शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

तस्करीतील जप्त प्राण्यांना हक्काचे घर; वनविभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 07:54 IST

राज्यभरात ‘रिटर्न टू वाइल्ड’ उपक्रम

- श्रीकिशन काळेपुणे : प्राण्यांची तस्करी होत असल्यास वनविभागाकडून ते प्राणी जप्त केले जातात. काही ठिकाणी रस्त्यात किंवा इतर ठिकाणी जखमी अवस्थेत प्राणी आढळतात. त्यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरी (अधिवासात) पाठविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील अशा प्राण्यांना ‘रिटर्न टू वाइल्ड’ या उपक्रमाद्वारे पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे.राज्यात विविध ठिकाणी प्राण्यांना रेस्क्यू केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडले जाते. अनेकदा शासकीय यंत्रणेच्या कात्रीत हे प्राणी अडकतात आणि त्यांचे अधिवासात जाणे रखडते. त्यामुळे आता मुख्य प्रधान वनसंरक्षक (वाइल्ड) सुनील लिमये यांच्या पुढाकाराने अशा प्राण्यांना अधिवासात सोडण्यासाठी खास समिती बनवली आहे. त्यामध्ये रेस्क्यू टीमच्या नेहा पंचमिया, वनसंरक्षक (वन्यजीव, पुणे) बी. रमेश आणि युवराज पाटील यांचा समावेश आहे. या समितीला कॅप्टन वाइल्ड कमिटी असे नाव दिले आहे.नेहा पंचमिया म्हणाल्या, ‘सध्या सर्व राज्यांतील वनविभागांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्राण्यांची माहिती व संख्या देण्यास सांगितले आहे. त्यासाठी ऑनलाइन सिस्टीम टूल विकसित केले असून, त्यावर सर्वजण माहिती अद्यावत करत आहेत.राज्यातील सर्व प्राण्यांना पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासामध्ये सोडण्यात येईल. सरपटणारे प्राणी, कासव, दुर्मीळ प्रजाती आदी प्राण्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.- नेहा पंचमिया, संस्थापक अध्यक्ष, रेस्क्यू, पुणेकासव विमानाने हक्काच्या घरीकाही महिन्यांपूर्वी पुणे वनविभागाने दुर्मीळ जातीचे कासव व पाली पकडल्या होत्या. या कासवांचा अधिवास हा आसाम येथील होता. त्या कासवांना आपल्याकडील हवामान मानवत नाही. म्हणून त्यांना खास विमानाने आसामला पाठविण्यात आले. पुणे विभागाने राबविलेला हा उपक्रम राज्यातील पहिलाच ठरला