शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

तस्करीतील जप्त प्राण्यांना हक्काचे घर; वनविभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 07:54 IST

राज्यभरात ‘रिटर्न टू वाइल्ड’ उपक्रम

- श्रीकिशन काळेपुणे : प्राण्यांची तस्करी होत असल्यास वनविभागाकडून ते प्राणी जप्त केले जातात. काही ठिकाणी रस्त्यात किंवा इतर ठिकाणी जखमी अवस्थेत प्राणी आढळतात. त्यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरी (अधिवासात) पाठविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील अशा प्राण्यांना ‘रिटर्न टू वाइल्ड’ या उपक्रमाद्वारे पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे.राज्यात विविध ठिकाणी प्राण्यांना रेस्क्यू केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडले जाते. अनेकदा शासकीय यंत्रणेच्या कात्रीत हे प्राणी अडकतात आणि त्यांचे अधिवासात जाणे रखडते. त्यामुळे आता मुख्य प्रधान वनसंरक्षक (वाइल्ड) सुनील लिमये यांच्या पुढाकाराने अशा प्राण्यांना अधिवासात सोडण्यासाठी खास समिती बनवली आहे. त्यामध्ये रेस्क्यू टीमच्या नेहा पंचमिया, वनसंरक्षक (वन्यजीव, पुणे) बी. रमेश आणि युवराज पाटील यांचा समावेश आहे. या समितीला कॅप्टन वाइल्ड कमिटी असे नाव दिले आहे.नेहा पंचमिया म्हणाल्या, ‘सध्या सर्व राज्यांतील वनविभागांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्राण्यांची माहिती व संख्या देण्यास सांगितले आहे. त्यासाठी ऑनलाइन सिस्टीम टूल विकसित केले असून, त्यावर सर्वजण माहिती अद्यावत करत आहेत.राज्यातील सर्व प्राण्यांना पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासामध्ये सोडण्यात येईल. सरपटणारे प्राणी, कासव, दुर्मीळ प्रजाती आदी प्राण्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.- नेहा पंचमिया, संस्थापक अध्यक्ष, रेस्क्यू, पुणेकासव विमानाने हक्काच्या घरीकाही महिन्यांपूर्वी पुणे वनविभागाने दुर्मीळ जातीचे कासव व पाली पकडल्या होत्या. या कासवांचा अधिवास हा आसाम येथील होता. त्या कासवांना आपल्याकडील हवामान मानवत नाही. म्हणून त्यांना खास विमानाने आसामला पाठविण्यात आले. पुणे विभागाने राबविलेला हा उपक्रम राज्यातील पहिलाच ठरला