शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

गारांचा मारा सुरूच

By admin | Updated: April 13, 2015 06:04 IST

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पावसाचा मारा सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत सहा जणांचे बळी गेले आहेत.

मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पावसाचा मारा सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत सहा जणांचे बळी गेले आहेत. त्यात खान्देशातील चार व नगरमधील दोघांचा समावेश आहे. सलग तीन दिवसांच्या गारांच्या माऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा मराठवाडा व खान्देशला बसला आहे. मराठवाड्यात जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबादेत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी गारांचा मारा सुरू होता, त्यामुळे शेतपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.धुळे जिल्ह्यात मनोज युवराज साने (२२, रा. धोंगडे ता. साक्री) हा युवक अंगावर वीज पडून जागीच ठार झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीररीत्या भाजले. जळगावमध्ये झाड कोसळून मेहमुदा शेख चांद (५०) ही महिला तर बाबुलाल सोनावणे यांचा मृत्यू झाला. रावेर येथे विजेचा खांब अंगावर पडून रामसिंग सुका साबळे (५०) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच जखमी झाले आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये गारपिटीने कांदा व केळीचे नुकसान झाले. मराठवाड्यात वादळी पावसामुळे झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोलमडली. बीडमध्ये सलग चौथ्या दिवशी गारा बरसल्या. लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री गारांचा पाऊस झाला. नांदेड, जालना, हिंगोलीत सलग तीन दिवस वादळी पाऊस सुरू असल्याचे शेती उद्ध्वस्त झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)