शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 02:14 IST

माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली.

अक्षय चोरगे मुंबई : माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिर उभारल्यानंतर काही वर्षांनी आसपासची जमीन जी.एस.बी. मंदिर ट्रस्टने खरेदी केली आणि तेव्हापासून मंदिर ट्रस्टकडे आहे.कोळी बांधवांसह मंदिरात बंगाली बांधव मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. तर सिंधी बांधव दसºयाच्या दिवशी लहान मुलांचे जायवळ काढण्यासाठी येतात. म्हणूनच शितळादेवी मंदिरात दसºयाला मोठी गर्दी असते. कोळी समाजातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला शितळादेवीच्या पायावर ठेवण्याची प्रथा आहे.देवीच्या दर्शनासाठी मंदिरातरांगा लागल्या, तरी योग्य नियोजनामुळे कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की होत नाही. सुरक्षेसाठी येथे पूर्णवेळ पहारेकरी आहेत. महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळातर्फे नवरात्रौत्सवादरम्यान मुंबईतील ज्या पाच मंदिरांचे दर्शन घडवले जाते, त्यातील एक म्हणजे शितळादेवी मंदिर. मंदिराचे आणि देवीचे नाव शितळादेवी आहे. परंतु लोकांनी त्याचा अपभं्रश करून शितलादेवी असे केले आहे, असे जुन्या जाणत्या व्यक्तींनी सांगितले. शितळादेवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देवीसाठी सोन्याचा मुलामा दिलेलामुखवटा आहे.खोकला बरा करणारी खोकलादेवीशितळादेवी मंदिर परिसरात खोकलादेवीचेही एक प्रसिद्ध मंदिर आहे. खोकलादेवीचे दर्शन घेतल्यावर खोकल्याचा आजार बरा होतो अशी लोकांची श्रद्धा आहे.>मंदिराच्या शेजारी एक जुनी विहीर आहे. कोळी बांधवांच्या घरी लग्नकार्य असेल तर शुभ शकुन म्हणून या विहिरीतील पाणी नेतात. नवरदेवाच्या आंघोळीसाठीसुद्धा या विहिरीचे पाणी नेले जाते. विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे, मात्र पालिकेने सर्व घरांमध्ये नळांची सुविधा दिल्याने विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नाही.>मंदिरातील उत्सवमंदिरात अश्विन महिन्यात घटस्थापनेपासून दसºयापर्यंत दहा दिवस शारदोत्सव (नवरात्रौत्सव) साजरा केला जातो. तर माघ महिन्यात पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत माघी शारदोत्सव (माघी नवरात्रौत्सव) साजरा केला जातो. कुमारिका पूजन, पालखी सोहळा हे त्यापैकी मोठे सोहळे आहेत. या काळात दररोज सात हजारांहून अधिक भाविक दर्शनाला येतात.