शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वावरून युती तोडली : उद्धव

By admin | Updated: October 3, 2014 00:33 IST

कोल्हापुरातील प्रचारसभेत भाजपवर हल्लाबोल

कोल्हापूर : केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता यावी हे आमचे स्वप्न होते. स्वप्न सत्यात उतरले, पण त्यानंतर एक कटूसत्यही समोर आले. भाजपला हिंदुत्वाचा मुद्दा जड व्हायला लागला होता, म्हणूनच त्यांनी पंचवीस वर्षांची शिवसेनेबरोबरची युती तोडली, असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील पेटाळा मैदानावर झालेल्या प्रचारसभेत केला. महाराष्ट्राचे तुकडे पाडू पाहणाऱ्यांचा या निवडणुकीत साफ पराभव करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात ठाकरे यांनी भाजपसह कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कारभाराचा तसेच वर्तनाचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, पण भारतीय जनता पक्षाला हा मुद्दा जड व्हायला लागला होता. त्यामुळे जागांचे कारण ताणून धरत त्यांनी युती तोडली. भाजपने ३४ जागा मागितल्या होत्या. आम्ही त्यांना १८ जागा द्यायला तयार होतो. तरीही त्यांनी हट्ट सोडला नाही. मला माझी संघटना कापून आणि महाराष्ट्राची वाटणी करून जागा वाटप नको होते, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राने त्यांना केंद्रात साथ दिली, पण आता त्यांनी लाथ मारली आहे. त्यामुळे शिवसेनेला एक लढाई लढावी लागत आहे. कोणतीही लढाई ही संख्येवर लढली जात नाही, तर ती निष्ठेवर जिंकली जाते. आमचे सैनिक हे निष्ठावंत आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर आम्ही ही लढाई जिंकू, असा मला विश्वास आहे. शिवसेनेला एकाकी पाडले असे कोणी म्हणत असेल तर मग सभेला ही गर्दी कशी होते असा सवाल करीत ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्यावरील भाजपच्या बेगडी प्रेमावरही टीका केली. आज यांना गांधीजींची आठवण झाली. दरवर्षी बापूजींना कोण हार घालत होता आणि आता कोण घालत आहे, हे आज गांधी जयंतीदिनी आपण पाहिले. गांधीजींना अपेक्षित असलेले कार्यकर्ते सत्तेत बसले आहेत का, हे तपासायची वेळ आली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही ठाकरे यांनी हल्लाबोल केला. या नेत्यांनी महाराष्ट्र उलट्या दिशेने नेला आहे. पंधरा वर्षे सत्तेत बसल्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या संस्थानिकांना सत्तेचा माज आला आहे. त्यांचा माज या निवडणुकीत उतरवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, विजय देवणे, मुरलीधर जाधव, मारुतीराव जाधव गुरुजी, राजेखान जमादार, संप्रदा ठिकपुर्र्ले यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संपर्क नेते दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, संजय घाटगे, नरसिंग गुरुनाथ पाटील, प्रकाश आबिटकर, आदी उपस्थित होते. जोडवी देणारे तुम्ही कोण?कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत दोन बोके आहेत. एकजण मटण, तर दुसरा दारू वाटतोय. एकजण साडी, तर दुसरा जोडवी वाटत आहेत. अहो, पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे; कारण लग्नाआधी भाऊ जोडवी देतो, लग्नानंतर तिचा नवरा देतो. त्यामुळे तुम्हाला जोडवी वाटायचा अधिकार कोणी दिला? अशी विचारणा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. ‘दक्षिण’मध्ये मटण, दारू, जोडवी व पैसे यांतील काहीच चालणार नाही. इथे फक्त बाणच चालेल, असे त्यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरातील पहिलीच सभा असल्याने तुडुंब गर्दी झाली होती. ही गर्दी पाहून ठाकरे यांनी ‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी आहे? त्यांनी इथे येऊन पाहावे’ असे म्हणताच शिवसैनिकांतून ‘जय भवानी... जय शिवाजी’चा जयघोष करून दाद दिली.

जेवढे आयुष्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीसाठी खर्च केले, त्यातील दहा टक्के शिवसेनेसाठी खर्च केले असते तर ते सार्थकी लागले असते, अशी सल शिरोळचे शिवसेना उमेदवार उल्हास पाटील यांनी बोलून दाखविली. तीन वेळा पराभूत झाल्यावर थेंबही अश्रू आला नाही. उमेदवारी नाकारल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून आपला बांध फुटल्याचेही त्यांनी सांगितले.शिवसेना व्हिजन डॉक्युमेंटशिवसेना सत्तेत आल्यावर कोल्हापूरला कृषी केंद्र उभारणार.आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टॅब’ देणार प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, पुण्याला जोडणारटोलमुक्त महाराष्ट्र करण्याबरोबर एलबीटी रद्द करणार.शेट्टींनी ऐकले नाहीयुती तुटल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांना भाजपबरोबर जाऊ नका असे सांगून २५ वर्षे त्यांच्यासोबत राहून आम्हाला जर हा अनुभव येत असेल तर तुमचे काय होईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. उलट काही महिन्यांपूर्वी हेच संघटनेचे लोक आपल्याकडे कांद्याच्या भावासंदर्भात सरकारविरोधी भूमिका मांडण्यासाठी आले होते. त्यावेळी आपलं सरकार आहे. त्यामुळे मंत्र्यांचे पुतळे जाळू नका, असे सांगितले होते. यावेळी सरकारची आपण पाठराखण केली. नंतर मात्र पाठराखण केलेले पाठीमागे राहिले आणि नको ते हातात हात घालून एकत्र आले, अशा शब्दांत शेट्टी यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली.