शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद - एन. डी. पाटील

By admin | Updated: February 22, 2016 02:09 IST

अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी

कोल्हापूर : अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी रविवारी केला. सांप्रदायिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातनी, अविवेकी शक्तीच्या विरोधात आक्रमकपणे लढत राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, माजी कुलगुरू राम ताकवले, डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. पाटील म्हणाले, केवळ हिंदू राष्ट्र बनविण्याचा विचार असलेली शक्ती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर फोफावली आहे. धर्मनिरपेक्षतेची कवचकुंडल असलेल्या राज्यघटनेवर गदा आणण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या होत आहे. धर्माच्या नावावर एकोपा धोक्यात आणली जात आहे. मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया, ‘स्टार्ट अप’च्या गोंडस नावाखाली विषमतेची दरी रूंदावत आहे. देशात केवळ हिंदूंनाच महत्त्व देण्याची भाजपची नीती सर्वसामान्य हिंदूंना पटलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपाच्या मतांची टक्केवारी घटते आहे, असे ते म्हणाले. सती प्रथा, बालविवाह, विद्वान दुय्यम वागणूक असलेल्या हिंदू धर्माचा अभिमान बाळगण्यात काय आहे, असा सवालही प्रा. एन. डी. पाटील यांनी या वेळी उपस्थित केला. आता कारे म्हटल्यानंतर सौम्य भाषेत उत्तर देणे परवडणारे नसून आक्रमकपणे त्याच भाषेत उत्तर देणे उचित होईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात : राज्यकर्त्यांच्या सुलतानी संकटामुळे १९९५ ते २०१५पर्यंत राज्यातील ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून अपमानित जीवनाचा अंत केला. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. इंग्रजांच्या विरोधात लढताना व दुसऱ्या महायुद्धातही इतक्या लोकांचा मृत्यू झाला नव्हता. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर राज्यकर्ते भेकड सल्ला देत आहे, हे संतापजनक आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.