शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद - एन. डी. पाटील

By admin | Updated: February 22, 2016 02:09 IST

अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी

कोल्हापूर : अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी रविवारी केला. सांप्रदायिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातनी, अविवेकी शक्तीच्या विरोधात आक्रमकपणे लढत राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, माजी कुलगुरू राम ताकवले, डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. पाटील म्हणाले, केवळ हिंदू राष्ट्र बनविण्याचा विचार असलेली शक्ती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर फोफावली आहे. धर्मनिरपेक्षतेची कवचकुंडल असलेल्या राज्यघटनेवर गदा आणण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या होत आहे. धर्माच्या नावावर एकोपा धोक्यात आणली जात आहे. मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया, ‘स्टार्ट अप’च्या गोंडस नावाखाली विषमतेची दरी रूंदावत आहे. देशात केवळ हिंदूंनाच महत्त्व देण्याची भाजपची नीती सर्वसामान्य हिंदूंना पटलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपाच्या मतांची टक्केवारी घटते आहे, असे ते म्हणाले. सती प्रथा, बालविवाह, विद्वान दुय्यम वागणूक असलेल्या हिंदू धर्माचा अभिमान बाळगण्यात काय आहे, असा सवालही प्रा. एन. डी. पाटील यांनी या वेळी उपस्थित केला. आता कारे म्हटल्यानंतर सौम्य भाषेत उत्तर देणे परवडणारे नसून आक्रमकपणे त्याच भाषेत उत्तर देणे उचित होईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात : राज्यकर्त्यांच्या सुलतानी संकटामुळे १९९५ ते २०१५पर्यंत राज्यातील ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून अपमानित जीवनाचा अंत केला. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. इंग्रजांच्या विरोधात लढताना व दुसऱ्या महायुद्धातही इतक्या लोकांचा मृत्यू झाला नव्हता. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर राज्यकर्ते भेकड सल्ला देत आहे, हे संतापजनक आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.