शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

राज्यातील टेकड्या होणार हिरव्यागार

By admin | Updated: October 7, 2015 01:45 IST

राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांंवर वृक्षसंवर्धन करण्याची योजना राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत

- राजानंद मोरे, पुणेराज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांंवर वृक्षसंवर्धन करण्याची योजना राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आणि देवस्थाने असलेल्या टेकड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या माध्यमातून टेकड्यांवर होणारे अतिक्रमण रोखले जाणार आहे.सध्या राज्यातील ३०७ लाख हेक्टर भौगालिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर जमीन वृक्षाच्छादित आहे. हे प्रमाण साधारण २० टक्के असून, धोरणानुसार हे क्षेत्र किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. पहिल्या टप्प्यात १२ टेकड्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्याचे काम ८ ते १० दिवसांत सुरू होईल. पुढील वर्षी पावसाळ््यापूर्वी वृक्षारोपणाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या आर्थिक वर्षांसाठी शासनाने २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०१६-१७ या वर्षासाठी ६.२० कोटी, २०१७-१८ साठी ४४० कोटी, २०१८-१९ साठी २.६० कोटी तर २०१९-२० वर्षासाठी १.८० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.जुन्या योजनांप्रमाणे सामाजिक वनीकरण विभागाने या योजनांवर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. या योजना नवीन असल्याने लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.- अतुलराज चढ्ढा, अपर महासंचालक, सामाजिक वनीकरण विभाग