शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

जागावाटपावरून महाआघाडीत धुसफुस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:09 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीने अवघ्या तीन जागांवर घटकपक्षांची बोळवण केल्यानंतर महाआघाडीतील धुसफुस वाढली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता आमदार कपिल पाटील यांनी महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीने अवघ्या तीन जागांवर घटकपक्षांची बोळवण केल्यानंतर महाआघाडीतील धुसफुस वाढली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता आमदार कपिल पाटील यांनी महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही मुद्द्यांची वा अजेंड्याची चर्चा न करता मित्रपक्षांना परस्पर तीन जागा टेकविल्याबद्दल पाटील यांनी खुले पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.लोकतांत्रिक जनता दलाचे नेते कपिल पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खुले पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरूप येऊ शकणार नाही. आंबेडकर, राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली व अन्य पक्षांना विधानसभेत जागा सोडण्याचे आश्वासन दिले की आघाडी झाली, असे मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडी अजेंड्यावरच स्थान नसेल तर आंबेडकर यांच्याशी सन्मानाने चर्चा कशी होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. मुद्दे वा अजेंड्याची चर्चा न करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचे जाहीर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच छोट्या डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचे काम करायचे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. किमान, वाजंत्री कोणत्या मुद्द्यांची वाजवायची हे तरी स्पष्ट करा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारण