शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

मराठवाड्यात झाले सर्वाधिक उलटे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:02 IST

योगेश बिडवई। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, ...

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, पुण्यासह शहरी भागातून निमशहरी व छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटे स्थलांतर झाले असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. संबंधित सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उत्तरदात्यांपैकी मराठवाड्यातील ५३ टक्के कामगार गावी परतल्याचे अभ्यासातून समोर आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार अभ्यास केंद्र आणि द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत अभ्यास करण्यात आला. मागास-अविकसित जिल्ह्यांतील अर्थव्यवस्था रोजगार पुरवण्यासाठी सक्षम नसल्याने मजूर मोठ्या शहरांत विविध असंघटित क्षेत्रांत काम करतात. सहाव्या आर्थिक गणनेनुसार राज्यातील एकूण रोजगारांपैकी सुमारे ७0 टक्के रोजगार हा मुंबई व उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी भागांतच केंद्रित झाला आहे. मात्र लोकसंख्येची घनता अधिक असल्याने हा भागच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित बनल्याने ठप्प झाला.मुंबई, ठाणे परिसरातून गावी परतलेले सर्वाधिक कामगार कोकण आणि पुणे, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.पुणे जिल्ह्यातून मराठवाड्यात सर्वाधिक कामगार परतले.शहरांमध्ये अनेकांना फुटकळ रोजगार मिळतो, ही वस्तूस्थिती कोरोनामुळे समोर आली. संरक्षित स्वरुपाचा रोजगार नसल्याने तो गेल्यावर लोकांना गावी परतले लागले. गावातही शेतीखेरीज इतर चांगल्या रोजगाराच्या संधी नाहीत. शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहेत. कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे गरजेचे आहे.- प्रा. राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठवाड्यातील स्थलांतरित आकडेवारी पाहता त्यातूनच येथील सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता समोर येते. शेतीक्षेत्रातील पेच आणि रोजगार संधीअभावी मागास जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे. ग्रामीण भाग, शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरी केंद्रित विकासाच्या विकेंद्रिकरणाची आवश्यकता आहे.- डॉ. विवेक घोटाळे, कार्यकारी संचालक, द युनिक फाउंडेशन, पुणे