शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मराठवाड्यात झाले सर्वाधिक उलटे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:02 IST

योगेश बिडवई। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, ...

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, पुण्यासह शहरी भागातून निमशहरी व छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटे स्थलांतर झाले असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. संबंधित सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उत्तरदात्यांपैकी मराठवाड्यातील ५३ टक्के कामगार गावी परतल्याचे अभ्यासातून समोर आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार अभ्यास केंद्र आणि द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत अभ्यास करण्यात आला. मागास-अविकसित जिल्ह्यांतील अर्थव्यवस्था रोजगार पुरवण्यासाठी सक्षम नसल्याने मजूर मोठ्या शहरांत विविध असंघटित क्षेत्रांत काम करतात. सहाव्या आर्थिक गणनेनुसार राज्यातील एकूण रोजगारांपैकी सुमारे ७0 टक्के रोजगार हा मुंबई व उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी भागांतच केंद्रित झाला आहे. मात्र लोकसंख्येची घनता अधिक असल्याने हा भागच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित बनल्याने ठप्प झाला.मुंबई, ठाणे परिसरातून गावी परतलेले सर्वाधिक कामगार कोकण आणि पुणे, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.पुणे जिल्ह्यातून मराठवाड्यात सर्वाधिक कामगार परतले.शहरांमध्ये अनेकांना फुटकळ रोजगार मिळतो, ही वस्तूस्थिती कोरोनामुळे समोर आली. संरक्षित स्वरुपाचा रोजगार नसल्याने तो गेल्यावर लोकांना गावी परतले लागले. गावातही शेतीखेरीज इतर चांगल्या रोजगाराच्या संधी नाहीत. शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहेत. कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे गरजेचे आहे.- प्रा. राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठवाड्यातील स्थलांतरित आकडेवारी पाहता त्यातूनच येथील सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता समोर येते. शेतीक्षेत्रातील पेच आणि रोजगार संधीअभावी मागास जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे. ग्रामीण भाग, शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरी केंद्रित विकासाच्या विकेंद्रिकरणाची आवश्यकता आहे.- डॉ. विवेक घोटाळे, कार्यकारी संचालक, द युनिक फाउंडेशन, पुणे