शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

मराठवाड्यात झाले सर्वाधिक उलटे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:02 IST

योगेश बिडवई। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, ...

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, पुण्यासह शहरी भागातून निमशहरी व छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटे स्थलांतर झाले असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. संबंधित सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उत्तरदात्यांपैकी मराठवाड्यातील ५३ टक्के कामगार गावी परतल्याचे अभ्यासातून समोर आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार अभ्यास केंद्र आणि द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत अभ्यास करण्यात आला. मागास-अविकसित जिल्ह्यांतील अर्थव्यवस्था रोजगार पुरवण्यासाठी सक्षम नसल्याने मजूर मोठ्या शहरांत विविध असंघटित क्षेत्रांत काम करतात. सहाव्या आर्थिक गणनेनुसार राज्यातील एकूण रोजगारांपैकी सुमारे ७0 टक्के रोजगार हा मुंबई व उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी भागांतच केंद्रित झाला आहे. मात्र लोकसंख्येची घनता अधिक असल्याने हा भागच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित बनल्याने ठप्प झाला.मुंबई, ठाणे परिसरातून गावी परतलेले सर्वाधिक कामगार कोकण आणि पुणे, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.पुणे जिल्ह्यातून मराठवाड्यात सर्वाधिक कामगार परतले.शहरांमध्ये अनेकांना फुटकळ रोजगार मिळतो, ही वस्तूस्थिती कोरोनामुळे समोर आली. संरक्षित स्वरुपाचा रोजगार नसल्याने तो गेल्यावर लोकांना गावी परतले लागले. गावातही शेतीखेरीज इतर चांगल्या रोजगाराच्या संधी नाहीत. शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहेत. कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे गरजेचे आहे.- प्रा. राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठवाड्यातील स्थलांतरित आकडेवारी पाहता त्यातूनच येथील सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता समोर येते. शेतीक्षेत्रातील पेच आणि रोजगार संधीअभावी मागास जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे. ग्रामीण भाग, शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरी केंद्रित विकासाच्या विकेंद्रिकरणाची आवश्यकता आहे.- डॉ. विवेक घोटाळे, कार्यकारी संचालक, द युनिक फाउंडेशन, पुणे