शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

एकीकडे चांगले शिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे उद्योजकांना आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला

मुख्यमंत्री : राष्ट्रीय कार्यशाळेचे उद््घाटननागपूर : एकीकडे चांगले शिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे उद्योजकांना आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला राज्यात सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर केले.अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्यावतीने झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ कार्यशाळेचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत, प्रा. ए.एस.मन्था, उच्च व तंत्र शिक्षण विभागचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित. जेआयटीचे अध्यक्ष महेश साधवानी, सचिव वीरेंद्र कुकरेजा,व्हीएनआयटीचे प्रमुख डॉ. व्ही.आर. जामकर व्यासपीठावर उपस्थित होते.कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर सरकारचा भर असेल, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कौशल्य विकासाबाबत राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रमांची आखणी होत असताना मागील पाच वर्षांत २५ टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट साध्य होऊ शकले नाही. देशात ६५ टक्के युवकांची संख्या असून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उद्योजकांनी स्थानिक विकासासाठी राखून ठेवलेल्या निधीतून कौशल्य विकास कार्यक्रम राबविल्यास हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तंत्र शिक्षण संस्थांनी रोजगारावर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत, असे आवाहन डॉ. संजय चहांदे यांनी केले. प्रास्ताविक झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष महेश साधवानी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आमदार आशिष देशमुख, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, जयप्रकाश सहजरामानी, प्राचार्य डॉ. एस.एस. लिमये, प्रमोद वैरागडे, माधवी वैरागडे, प्रमोद पामपटवार, तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)२० कोटी युवकांना प्रशिक्षणकौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील २० कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. मंत्रालयाच्या २० विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील १८ विषयांसंदर्भात कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.