शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

एकीकडे चांगले शिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे उद्योजकांना आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला

मुख्यमंत्री : राष्ट्रीय कार्यशाळेचे उद््घाटननागपूर : एकीकडे चांगले शिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे उद्योजकांना आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला राज्यात सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर केले.अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्यावतीने झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ कार्यशाळेचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत, प्रा. ए.एस.मन्था, उच्च व तंत्र शिक्षण विभागचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित. जेआयटीचे अध्यक्ष महेश साधवानी, सचिव वीरेंद्र कुकरेजा,व्हीएनआयटीचे प्रमुख डॉ. व्ही.आर. जामकर व्यासपीठावर उपस्थित होते.कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर सरकारचा भर असेल, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कौशल्य विकासाबाबत राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रमांची आखणी होत असताना मागील पाच वर्षांत २५ टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट साध्य होऊ शकले नाही. देशात ६५ टक्के युवकांची संख्या असून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उद्योजकांनी स्थानिक विकासासाठी राखून ठेवलेल्या निधीतून कौशल्य विकास कार्यक्रम राबविल्यास हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तंत्र शिक्षण संस्थांनी रोजगारावर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत, असे आवाहन डॉ. संजय चहांदे यांनी केले. प्रास्ताविक झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष महेश साधवानी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आमदार आशिष देशमुख, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, जयप्रकाश सहजरामानी, प्राचार्य डॉ. एस.एस. लिमये, प्रमोद वैरागडे, माधवी वैरागडे, प्रमोद पामपटवार, तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)२० कोटी युवकांना प्रशिक्षणकौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील २० कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. मंत्रालयाच्या २० विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील १८ विषयांसंदर्भात कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.