शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हायकोर्टाचा ‘ब्रेक’; स्थगितीनंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 09:37 IST

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सुमारे ३५ आगारांतील एसटी कर्मचारी संपावर असताना बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाण्याची भीती असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने या संपाला ‘ब्रेक’ लावला. न्यायालयाने संपाला स्थगिती देत गुरुवारी या याचिकेवर सुनावणी ठेवली. या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आणखी काही संघटनांनी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याबाबत एमएसआरटीसीला पत्र लिहिल्याने गुरुवारपासून एसटीचे संपूर्ण कामकाज बंद पडेल, या भीतीने एमएसआरटीसीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. 

‘कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या तरीही बेकायदेशीरपणे संप सुरूच आहे. एसटीची सेवा सार्वजनिक असल्याने आम्ही लोकांना सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र, मागण्या मान्य करण्यासाठी संप पुकारून काही कर्मचारी संघटना आम्हाला एक प्रकारे ब्लॅकमेल करीत आहेत, असा युक्तिवाद एमएसआरटीसीतर्फे ॲड. जी. एस. हेगडे व ॲड. पिंकी भन्साली यांनी केला.गेली काही वर्षे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. तरी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. मात्र, दिवाळीच्या दिवसांत संप पुकारून कर्मचारी सामान्य जनतेला विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला ज्यांना वाहतुकीसाठी एसटीशिवाय पर्याय नाही, अशा लोकांना वेठीस धरत आहेत. गेले काही आठवडे ग्रामीण भागातील लोकांची खूप गैरसोय होत आहे, असे एमएसआरटीसीने याचिकेत म्हटले आहे.

एसटीला दररोज ३.५ कोटींचा तोटा

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्याचा फटका  एसटी तिजोरीलाही बसला आहे. कारण, संपामुळे प्रवासीसंख्येत पाच लाखांची घट झाली असून  दररोज सरासरी साडेतीन कोटींचे  नुकसान होत आहे.राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉककाळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी ३५ आगारांतील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल हाेत आहेत. तर प्रवासीसंख्या घटल्यामुळे एसटीचेही दररोज साडेतीन कोटींचे नुकसान होत आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपापूर्वी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या २७ लाख होती. यामध्ये  घट होऊन ती २२ लाखांपर्यंत पोहीेचली आहे. 

टॅग्स :state transportएसटीHigh Courtउच्च न्यायालय