शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हायकोर्टाचा ‘ब्रेक’; स्थगितीनंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 09:37 IST

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सुमारे ३५ आगारांतील एसटी कर्मचारी संपावर असताना बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाण्याची भीती असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने या संपाला ‘ब्रेक’ लावला. न्यायालयाने संपाला स्थगिती देत गुरुवारी या याचिकेवर सुनावणी ठेवली. या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आणखी काही संघटनांनी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याबाबत एमएसआरटीसीला पत्र लिहिल्याने गुरुवारपासून एसटीचे संपूर्ण कामकाज बंद पडेल, या भीतीने एमएसआरटीसीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. 

‘कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या तरीही बेकायदेशीरपणे संप सुरूच आहे. एसटीची सेवा सार्वजनिक असल्याने आम्ही लोकांना सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र, मागण्या मान्य करण्यासाठी संप पुकारून काही कर्मचारी संघटना आम्हाला एक प्रकारे ब्लॅकमेल करीत आहेत, असा युक्तिवाद एमएसआरटीसीतर्फे ॲड. जी. एस. हेगडे व ॲड. पिंकी भन्साली यांनी केला.गेली काही वर्षे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. तरी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. मात्र, दिवाळीच्या दिवसांत संप पुकारून कर्मचारी सामान्य जनतेला विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला ज्यांना वाहतुकीसाठी एसटीशिवाय पर्याय नाही, अशा लोकांना वेठीस धरत आहेत. गेले काही आठवडे ग्रामीण भागातील लोकांची खूप गैरसोय होत आहे, असे एमएसआरटीसीने याचिकेत म्हटले आहे.

एसटीला दररोज ३.५ कोटींचा तोटा

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्याचा फटका  एसटी तिजोरीलाही बसला आहे. कारण, संपामुळे प्रवासीसंख्येत पाच लाखांची घट झाली असून  दररोज सरासरी साडेतीन कोटींचे  नुकसान होत आहे.राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉककाळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी ३५ आगारांतील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल हाेत आहेत. तर प्रवासीसंख्या घटल्यामुळे एसटीचेही दररोज साडेतीन कोटींचे नुकसान होत आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपापूर्वी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या २७ लाख होती. यामध्ये  घट होऊन ती २२ लाखांपर्यंत पोहीेचली आहे. 

टॅग्स :state transportएसटीHigh Courtउच्च न्यायालय