शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

By admin | Updated: November 4, 2016 01:00 IST

शहरात मागील काही दिवसांपासून थंडी वाढत असून, सर्दी-खोकला आणि ताप यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून थंडी वाढत असून, सर्दी-खोकला आणि ताप यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऋतूबदलाला सामोरे जाताना लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच डेंगी, चिकुनगुनिया आणि मलेरिया या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या काळातही हे संसर्गजन्य आजार आटोक्यात आले नाहीत. चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या आताही शहरात आणि राज्यात वाढत आहे. चिकुनगुनियामध्ये होणारी सांधेदुखी आणि त्यातच वातावरणाचा उतरलेला पारा यांमुळे रुग्णांना जास्त त्रास होण्याची शक्यता असल्याने या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी केले आहे. डॉ. जोशी म्हणाले, की सांध्यांशी निगडित आजार तापमानात घट झाल्याने वाढतात. यातही हे आजार जुने असल्यास थंडीच्या दिवसांत रुग्णांना अधिकच त्रास होतो. त्यामुळे या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चिकुनगुनियासारखा कोणताही संसर्गजन्य आजार ६ आठवडे राहतो; मात्र हे दुखणे त्याहून जास्त राहिल्यास इतर तपासण्या करणे गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत उबदार कपडे वापरावेत तसेच थंडीपासून संरक्षण होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांत त्वचेचे त्रासही वाढत असल्याने कोरडी त्वचा असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. व्यायामासाठीही हा कालावधी चांगला असल्याने व्यायाम करण्यास सुरुवात करावी. (प्रतिनिधी)> चिकुनगुनियाच्या रुग्णांना अचानक पडलेल्या थंडीने त्रास होण्याची शक्यता असते. चिकुनगुनिया हा सांधेदुखीशी निगडित आजार असल्याने थंडीमध्ये शरीराचा रक्तपुरवठा कमी झाल्याने सांधेदुखीमध्ये वाढ होते. हालचाल न केल्यास हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असल्याने चिकुनगुनियासारखा आजार झालेल्यांनी थंडीच्या सुरुवातीला विशेष काळजी घ्यावी. अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनीही थंडीच्या काळात काळजी घ्यावी, अशा रुग्णांना अचानक त्रास होऊ नये यासाठी त्यांनी जास्तीची औषधे जवळ बाळगावीत. धुरापासूनही काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. जयंत नवरंगे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ>थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे वापरा.ताजा आणि पोटभर आहार घ्या.नाक, कान यांतून हवा जाणार नाही याची काळजी घ्या.दमा असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी.सर्दी असल्यास ती पसरणार नाही याची काळजी घ्या.घसा खराब असेल तर गरम पाणी प्या तसेच गरम पाण्याच्या गुळण्या करा.कफ आणि ताप दिर्घकाळ असेल तर अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.