शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

By admin | Updated: November 4, 2016 01:00 IST

शहरात मागील काही दिवसांपासून थंडी वाढत असून, सर्दी-खोकला आणि ताप यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून थंडी वाढत असून, सर्दी-खोकला आणि ताप यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऋतूबदलाला सामोरे जाताना लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच डेंगी, चिकुनगुनिया आणि मलेरिया या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या काळातही हे संसर्गजन्य आजार आटोक्यात आले नाहीत. चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या आताही शहरात आणि राज्यात वाढत आहे. चिकुनगुनियामध्ये होणारी सांधेदुखी आणि त्यातच वातावरणाचा उतरलेला पारा यांमुळे रुग्णांना जास्त त्रास होण्याची शक्यता असल्याने या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी केले आहे. डॉ. जोशी म्हणाले, की सांध्यांशी निगडित आजार तापमानात घट झाल्याने वाढतात. यातही हे आजार जुने असल्यास थंडीच्या दिवसांत रुग्णांना अधिकच त्रास होतो. त्यामुळे या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चिकुनगुनियासारखा कोणताही संसर्गजन्य आजार ६ आठवडे राहतो; मात्र हे दुखणे त्याहून जास्त राहिल्यास इतर तपासण्या करणे गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत उबदार कपडे वापरावेत तसेच थंडीपासून संरक्षण होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांत त्वचेचे त्रासही वाढत असल्याने कोरडी त्वचा असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. व्यायामासाठीही हा कालावधी चांगला असल्याने व्यायाम करण्यास सुरुवात करावी. (प्रतिनिधी)> चिकुनगुनियाच्या रुग्णांना अचानक पडलेल्या थंडीने त्रास होण्याची शक्यता असते. चिकुनगुनिया हा सांधेदुखीशी निगडित आजार असल्याने थंडीमध्ये शरीराचा रक्तपुरवठा कमी झाल्याने सांधेदुखीमध्ये वाढ होते. हालचाल न केल्यास हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असल्याने चिकुनगुनियासारखा आजार झालेल्यांनी थंडीच्या सुरुवातीला विशेष काळजी घ्यावी. अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनीही थंडीच्या काळात काळजी घ्यावी, अशा रुग्णांना अचानक त्रास होऊ नये यासाठी त्यांनी जास्तीची औषधे जवळ बाळगावीत. धुरापासूनही काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. जयंत नवरंगे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ>थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे वापरा.ताजा आणि पोटभर आहार घ्या.नाक, कान यांतून हवा जाणार नाही याची काळजी घ्या.दमा असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी.सर्दी असल्यास ती पसरणार नाही याची काळजी घ्या.घसा खराब असेल तर गरम पाणी प्या तसेच गरम पाण्याच्या गुळण्या करा.कफ आणि ताप दिर्घकाळ असेल तर अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.