शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

हेरातचा हल्ला मोदींच्या शपथविधीला विरोधासाठी

By admin | Updated: June 5, 2014 00:29 IST

भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील हेरात येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर नुकताच झालेला हल्ला हा लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी संघटनेचा कट असून, भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दूतावासातील कर्मचा:यांना ओलिस ठेवण्याचीही योजना होती, तसेच दूतावासाला वेढा घातला जाणार होता; पण हल्लेखोर मारले गेल्याने ही योजना सफल झाली नाही. हल्ला झाल्यानंतर हेरात दूतावासातील सुरक्षा अधिका:यांनी हल्ल्याचा प्रकार व मृतदेहांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. 
अफगाणिस्तानचे मावळते अध्यक्ष हमीद करझाई यांनी या हल्ल्यामागे लष्कर असल्याचे म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबाचे हल्लेखोर प्रशिक्षित असून, शस्त्रसज्ज असतात. त्यांचे लक्ष्य ठरलेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी तीन दिवस हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर दीर्घकाळ थांबण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्याकडे एके-47 रायफली, काडतुसाच्या सहा फैरी, तोफगोळ्यांचा मारा करण्याचे साहित्य होते. तसेच त्यांच्याकडील मोबाईलमध्ये दोन सीमकार्डे बसविण्याची सोय होती. त्यात बीबीसी, अॅरियाना टीव्ही स्टेशन व काबूलमधील भारतीय दूतावासाचे फोन नंबर होते. 
पहाटे 4 पासून गोळीबार सुरू झाला. आयटीबीपीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे हल्लेखोरांना शेजारच्या घरात आश्रय घ्यावा लागला. अफगाण सैनिकही लगेच सहभागी झाले. आठ तास चाललेल्या गोळीबारात हल्लेखोरांचा बीमोड झाला; पण एक हल्लेखोर निसटला असण्याची शक्यता आहे, कारण मृतदेह तीनच मिळाले आहेत. या हल्लेखोरांनी स्फोटकांची जाकिटे घातलेली नव्हती. ती तालिबानची पद्धत आहे. त्यामुळे हे लष्कर-ए- तोयबाचे  प्रशिक्षित हल्लेखोर असावेत या तर्काला पुष्टी मिळते.  अफगाणिस्तानची  पुनर्रचना  करण्याच्या कामात भारताचा मोठा सहभाग असल्याने, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमध्ये अस्वस्थता आहे.  (वृत्तसंस्था)