शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

हेरातचा हल्ला मोदींच्या शपथविधीला विरोधासाठी

By admin | Updated: June 5, 2014 00:29 IST

भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील हेरात येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर नुकताच झालेला हल्ला हा लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी संघटनेचा कट असून, भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दूतावासातील कर्मचा:यांना ओलिस ठेवण्याचीही योजना होती, तसेच दूतावासाला वेढा घातला जाणार होता; पण हल्लेखोर मारले गेल्याने ही योजना सफल झाली नाही. हल्ला झाल्यानंतर हेरात दूतावासातील सुरक्षा अधिका:यांनी हल्ल्याचा प्रकार व मृतदेहांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. 
अफगाणिस्तानचे मावळते अध्यक्ष हमीद करझाई यांनी या हल्ल्यामागे लष्कर असल्याचे म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबाचे हल्लेखोर प्रशिक्षित असून, शस्त्रसज्ज असतात. त्यांचे लक्ष्य ठरलेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी तीन दिवस हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर दीर्घकाळ थांबण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्याकडे एके-47 रायफली, काडतुसाच्या सहा फैरी, तोफगोळ्यांचा मारा करण्याचे साहित्य होते. तसेच त्यांच्याकडील मोबाईलमध्ये दोन सीमकार्डे बसविण्याची सोय होती. त्यात बीबीसी, अॅरियाना टीव्ही स्टेशन व काबूलमधील भारतीय दूतावासाचे फोन नंबर होते. 
पहाटे 4 पासून गोळीबार सुरू झाला. आयटीबीपीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे हल्लेखोरांना शेजारच्या घरात आश्रय घ्यावा लागला. अफगाण सैनिकही लगेच सहभागी झाले. आठ तास चाललेल्या गोळीबारात हल्लेखोरांचा बीमोड झाला; पण एक हल्लेखोर निसटला असण्याची शक्यता आहे, कारण मृतदेह तीनच मिळाले आहेत. या हल्लेखोरांनी स्फोटकांची जाकिटे घातलेली नव्हती. ती तालिबानची पद्धत आहे. त्यामुळे हे लष्कर-ए- तोयबाचे  प्रशिक्षित हल्लेखोर असावेत या तर्काला पुष्टी मिळते.  अफगाणिस्तानची  पुनर्रचना  करण्याच्या कामात भारताचा मोठा सहभाग असल्याने, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमध्ये अस्वस्थता आहे.  (वृत्तसंस्था)